Friday, August 31, 2012

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे ,
र.स.प ची कविता वाचतो तेव्हा असाच वाटते ,कि ह्याच्या कवितेत आपण फार गुंतलो जातो,शब्द आणि भावांच्या मायाजालात असा गुंतवतो कि आत गेल्यावर बाहेर यायचे रस्तेच बंद ,ह्याच्या कवितेच्या बंदिशालेतले तुम्ही एक बंदीच,आणि ह्याच्या शब्दांची उबदार शेलारी ने तो बंदिवास नुसताच सुसह्य नव्हे तर हवा हवासा वाटतो,
ह्याच्या ब्लोग वर मी सफरीला गेलो तेव्हा कळले की हि आकाश गंगेची सफर आहे अगणित ताऱ्यांचे तेज सामावून हि आकाश गंगा लखलखते आहे ,हि अनंत आहे अगणित आहे ,गद्य पद्य ,चित्र ,साहित्याच्या आणि कवितेच्या सर्वांगानं स्पर्शून सुगंधित झाली आहे,नादोमय तेजोमय साहित्य च्या अगणित बुट्ट्या ची पैठणी नेसून आलेली कुल वधू च , जणू.
रसप ला परमेश्वराने कुठल्या मुशीतून घडवले आहे ते कदाचित तो हि विसरला असेल कारण तो असे चित्र तो कधीतरीच काढतो ,खरे तर काढू शकतो नाहीतर व्यंग चित्र काढणे हा नेहमीचा उद्योग.एखाद्या बाग्वानाने सर्वच प्रकारची झाडे लावावी आणि त्या सर्वच झाडांना रसरशीत फळे यावीत तशी रसप ची साहित्यकृती आहे ,काहीही उणे नाही.
हा नुसताच शब्दांचा डोंबारी नाही तर शब्द आणि भावाच्या कुमार संभावातून साहित्याची निर्मिती करणारा निर्माता आहे.
ह्याची प्रत्येक साहित्यकृती हा एक अमर्त्य चिंतनाचा एक साक्षात्कारी अनुभव,पण तो आनंदानुभव घ्यायला आपलीच झोळी फाटकी असता कामा नये नाही तर देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.
गोड कसे लागते,चाफ्याचा सुंगंध कसा असतो ह्याची मोज मापे अंकात मांडताच येत नाही ,हा अमृतानुभव आहे कुठल्याही मोजमापात बंदिस्त न करता येण्या जोगा ,हा ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो ,रसप च्या साहित्याकृतीना मैत्रयाणाचे शुभाशीर्वाद
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Thursday, August 30, 2012

नीरद ची जकात

नीरद ची जकात
महाराष्ट्र वारकऱ्यांचा प्रदेश आहे ,"भक्ती भावाने विठुरायाचे नाव घेत घेत पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा हा प्रदेश आहे,तसाच "भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू असे बजावणाऱ्या तुकोबांचा प्रदेश आहे ,इथल्या मातीला भोळा भाव माहिती आहे पण भोळसट भक्ती माहित नाही ,भक्ती आणि श्रद्धेला ज्ञानाची दिव्य दृष्टी ह्या मातीनेच दिली आहे ,इथला भूमिपुत्र सर्वार्थाने वारकरी आहे आनंदाने गात नाचत पंढरीला जाणारा मेणाहूनही मउ असणारा आणि वेळप्रसंगी धार्मिक आणि सामाजिक अपप्रवृत्तींवर बेशालक वार करणारा वारकरी,,
संताची नामावली तर विष्णू सहस्त्र नामा पेक्षाही मोठी ,डोळस भक्ती ची मुळे इथल्या मातीत घट्ट रुजली आहेत ,अंध श्रद्धा ,इथल्या मातीत रुजत नाही ,म्हणूनच ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम ,समर्थ रामदास ,संत नामदेव ,संत चोख मेळा,संत एकनाथ ,संत ज्ञान देव , ,संत जना बाई,मुक्ता बाई , आणि कित्येक संताने दिलेली ज्ञान दृष्टी अजूनही सुस्पष्ट आणि लखलखीत आहे ,,मराठी मनावर अनेक समाज सुधारकाने केलेलेले संस्कार शाबूत आहे , महात्मा फुले ,लोकहितवादी गोपाळराव देशमुख ,तेल्याताम्बोल्यांचे पुढारी लोकमान्य टिळक ,बाबासाहेब आंबेडकर ,न्यायमूर्ती रानडे,सार्वजनिक काका,शाहू महाराज,ह्यांची शिकवण अजूनही मराठी माणूस विसरला नाही ,"बहुजन हिताय बहु जन सुखाय "राज्यावर आलेली शिवमुद्रा अजूनही मराठी मनावरून पुसट झालेली नाही.
काही अभद्र घटना महाराष्ट्रात घडतात पण त्याचा समाचार घेणारे अर्वाचीन संत हि महाराष्ट्रात आहेत ,असाच एक वारकरी "नीरद जकातदारनीरद जकातदार ".
नागपूर च्या संत्र सारखे रसाळ रूप आणि वडा भाता सारखी चटपटीत लेखणी ,हा छोटा मुलगा इतके तर्क शुद्ध लिहितो कि भाषेला तोड नाही ,त्याच्या लेखातला एकही शब्द बदलण्याची हिम्मतही कोणाला होणार नाही.
तर्क शुद्ध विचार ,,विचारची सखोलता ,आणि अर्थशास्त्र ,समाज शास्त्र ,आणि वैचारिक सुस्पष्टते वर आधारित लेखन.आणि तेही अतिशय सभ्य आणि समंजस भाषेत,कसलाही आक्रस्ताळी पणा नसलेले विचार पूर्वक ठाम मते मांडणारेच नव्हे तर पटवणारे लेखन.वय आणि बुद्धी ह्याचा संबंध असोतोच असे नाही हे ठोक बजावून सांगणारे लेखन .
नीरद एक अर्वाचीन संताची भूमिका बजावतो आहे ,ज्याची प्रवृत्ती निरपेक्ष वृत्तीने समाज प्रबोधन करण्याची आहे तो संत.
ह्या लहान वयातही हे ईश्वरीय लेणे लाभते कसे ,उत्तर एकाच" शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी,
फक्त वयाने मोठा असल्याने मिळालेल्या निसर्ग दत्ता अधिकाराने नीरद ला अनेक आशीर्वाद खरे तर शुभेछाच ,आणि त्याला घडवणाऱ्या त्याच्या मत पित्यांना आणि गुरुजनांना मैत्रायानाचे सदर प्रणाम.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Tuesday, August 28, 2012

दगडी फुल (प्रशांत जामदार)

दगडी फुल (प्रशांत जामदार)
मसाल्याच्या पदार्थात दगडी फुल नावाचा एक पदार्थ असतो,तुम्हाला माहित आहे कि नाही मला माहित नाही पण मला मात्र माहिती आहे ,मसाल्याचे पदार्थ करताना आई आवर्जून हे वापरायची ,दगडी फुल नावच किती वेगळे तरीही काव्यात्मक आहे दगड आणि फुले ,दगडाचा भक्कम पण आणि फुलांची नाजूकता अनुभवाची असेल तर "प्रशांत जामदार "ह्या कवीची कविता वाचावी अगदी "फुल और पत्थर "शब्द शब्दांना वेदनेचा पाझर फोडणारी प्रशांतची कविता ,मानवी अपप्रवृत्तीवर कोरडे ओढताना दिसते , "दारावर लाख सत्कार झाले पण आते ये कोणी म्हणालेच नाही "हे शब्द म्हणजे "सहन होत नाही आणि सांगता येत नाही "अश्या वेदनेची एक अव्यक्त सल,वेदनेला शब्दात पकडता येत नाही पण भावात प्रगट करता येते ह्याचे सादरीकरण करणारी हि कविता.
वर वर शांत दिसणाऱ्या ह्या प्रशांतच्या कवीमनात वेदनेचे किती लाव्हा उफाळतात आहे हे समजायचे असेल तर माणूस प्रशांत सारखाच दिलदार पाहिजे,
काही कवी शब्दांचे गुलाम असतात शब्दांची चाकरी करता करता भावांशी नाती सोडतात पण प्रशांत ची कविता मात्र अगदी प्रथम पुरशी एक वचनी त्याच्या पूर्ण कह्यात असणारी शब्दांना सांभाळत भावना फुलवणारी "घे एकवार नाव माझे "हि अशीच एक साध्या सोप्या शब्दातून कवीच्या भाव विश्वाचे आरस्पानी दर्शन करवणारी कविता ,
प्रशांत ची कविता हि माणुसकीचा चेहरा मोहरा घेऊन येते आणि म्हणूनच ती म्हणते "राहू दे असेच डोळे आसवांना घर असुदे .......
प्रशांतची कविता हि सर्वगामी आहे सुखादुक्खा बरोबर उंच उंच झोका घेणारी ,आणि तरीही वास्तवाची साथ न सोडणारी.दुक्खला कुरवाळ णारी आणि सुखाला फुलवणारी आशय घन कविता."प्रशांत समयी हा प्रशांत चा काव्य संग्रह असावा त्याची लिंक त्याने दिली तर वाचायला सुलभ होईल.
प्रशांत हा अभिनेता दिग्दर्शक अश्या सर्वच क्षेत्रात लीलया वावरतो आणि आपला ठसा उमटवतो आहे,
हे व्यक्तिमत्वच बहु आयामी आणि प्रगल्भ आहे ,आणि दगडी फुला सारखे .दगडासारखे अचल आणि फुलासारखे कोमल.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Thursday, August 16, 2012

चिरंजीव ऋग्वेद ,

चिरंजीव ऋग्वेद ,
सप्रेम आशिर्वाद,तुझा निरोप मिळाला ,माझा लेख आवडला त्या बद्दल धन्यवाद,ऋग्वेद तुझा अवेळीचा पाऊस ,आणि सांज ह्या दोन्ही कविता ,मन मोहवून गेल्या ,ह्या दोन्ही काव्यात सांगितलेला घटना सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातही घडतात पण तुझ्या सारख्या कवींना मात्र त्यात काव्य दिसते म्हणून तर म्हणतात "जे न देखे रवी ते देखे कवी"तुझी कविता एक बंदिश वाटते शब्दात बांधलेली पण भावात भावनांना मोकळी करणारी,ऋग्वेद तू नावाप्रमाणेच ऋग्वेद ,तू मला आहेस ऋचाने बनलेला एक वेद ज्याच्या प्रत्येक ऋचेत मंत्र साधना आणि सामर्थ्य आहे ,मानवी मनाच्या स्पंदनाची भावगर्भ आवर्तने ह्या कवितेत आढळतात.,तुझ्या कवितेचे यथायोग्य वर्णन करण्याची क्षमता माझ्या शब्दात नाहीच नाही,तू मला भेटायला येशील तेव्हा मनात कृतज्ञतेचे उठणारे भाव म्हणतील "पुंडलिका भेटी परब्रम्ह आलेगा".माझा दूरध्वनी क्रमांक ९८२१४५८६०१ आहे.
शशांक रांगणेकर.

Tuesday, August 14, 2012

ऋग्वेदातल्या ऋचा

ऋग्वेदातल्या ऋचा
जे जे पंचा महा भुतांच्या लळीतशी निगडीत असते मग ते काव्य असो गद्य असो ते अक्षर असते.म्हणून तर वेदांची गणना अक्षर वान्ग्मायात झाली आहे.ज्या क्षर नाही ते अक्षर ,पंचमहाभूतांची ललिते अशीच चालू राहणार ,त्या ललीताना आपल्या कवितेत गुंफणारे काव्य अलोकिक आणि अजरामर ठरते ,कारण निसर्गाच्या लीला कायम असतात पण कवीच्या मनात त्यांना पाहून भाव मात्र बदलत असतात ,निसर्गाशी जवळीक साधत केले गेलेले काव्य अप्रतिम ठरते.मग ते मेघदूत असो अथवा ऋग्वेद चे अवेळी पाऊस असो आर्तता तीच ,हृदयातला ओलावा तसाच,म्हणून हा पाऊस ओले चिंब करतो ,नसा नसातल्या विरहाला जागवतो ,अतिशय नाजूक आणि भावस्पर्शी शब्दांचा फुलोरा फुलवणारी ह्याची कविता एक अप्रतिम कविता.शब्द भाव आणि सूर ह्याचा आरस्पानी नजराणा घेऊन आलेला हा "अवेळी पाऊस"नुसताच हवा हवासा वाटत नाही तर सतत बरसावासा
वाटतो..
ऋग्वेद चे काव्य सर्वगामी आहे ,आयुष्यातल्या टप्प्या टप्प्यातले हिशोब सांगणारे,मैत्रीच्या रमल खुणा आरस्पानी शब्दांच्या मीना बाजारात मांडणारे अथ पासून इति पर्यंतचा प्रवास अतिशय सुरेलपणे पार पडणारे.लोभस मोहक तरीही परखड. सांज हि कविता मैलाचा दगड ठरावी इतकी लक्षणीय.
ऋग्वेद हा कविता संगीत आणि निर्मिती ह्या तीनीही क्षेत्रतात प्रकाशणारा सायंतारा आहे ह्याच्या चांदण्यात केवळ शब्दांचीच रोषणाई नाही तर माणुसकीची हि उब भासते.,;ऋग्वेद ला मैत्रयाणाच्या शुभेच्छा.
शशांक रांगणेकर मुंबई ,
९८२१४५८६०२

Monday, August 13, 2012

दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो

दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो
सगुण परमेश्वराची आराधना करणे हि सामान्य माणसाची उपासना पण पर्वत शिखरावर दऱ्या खोऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वराला निर्गुण रुपात पाहणे हे फक्त योग्यालाच शक्य असते,निसर्गा कडे चला हा संदेश घेऊन ,तुमच्या कडे आलाय एक योगी नाव "सगुण भडकमकर"
सगुण हा खऱ्या अर्थाने पर्यावरण वादी आहे.निसर्गाच्या कुशीत जाऊन एकदातरी आभाळमाया अनुभवल्या शिवाय,शिवाय रान वारा फुफ्फुसात भरून घेतल्या शिवाय शहरी आयुष्याला पर्याय नाही हे आजकाल सर्वांनाच पटते आहे ,
सगुण ने आपल्या अथक परिश्रमाने मुरबाड जवळ एक मय सभा निर्माण केली आहे ,शत प्रती शत पर्यावरण वादी बांध काम,निसर्गाचे रौद्र रूप दाखवणारा तर कधी कधी अलुगुजासारके मंजुळ स्वर घुमावणारा रान वारा,हिरव्याकंच हिरवळीची शेलारी पांघरलेली सवाष्ण दरी आणि सोनेरी प्रकाश रेखा पसरवणारे कोवळे उन ,डोंगरांना डोळे मिचकावत मिचकावत ढुश्या देत देत पाळणारे ढग आणि इदं न मम म्हणत पर्वतावरून कोसळणारे जल प्रपात सारच काही काव्यमय ,सगुणाच्या ह्या प्रकल्पाचे नावच आहे हिरवे स्वप्न,खरोखर असे वाटते कि आयुष्यात एकदातरी निसर्गाचे हे मनमोहक रूप डोळे भरून बघावे ,एकदातरी तो पश्चिम वारा फुफ्फुसात भरून घ्यावा आणि ,शरीराचा रोम न रोम पुलकित करणारे निसर्ग स्पर्श अनुभवावे ,कदाचित हा तेजोमय स्पर्शच मनावरची काजळी पुसून उर्वरित आयुष्य लखलखीत करेल ,हेव्या दाव्याचे रुपया पैश्याचे ,देण्या घेण्याचे जग क्षण भर विसरता येईल आणि तो क्षण भरचा अमृत स्पर्श उर्वरित आयुष्य सुगंधित करेल.
सगुण हा एक उत्तम प्रकल्पक आहे विज्ञान आणि प्रकृती च्या हातात हात गुंफून त्याने हा प्रकल्प रेखाटला आहे ,आजच्या माणसाच्या गरजा आणि त्या गरजांची पूर्तता ह्यांची उत्तम सांगड त्यांनी इथे घातली आहे.
शून्यातून विश्वाची निर्मिती करताना शून्यालाच शरण जावे लागते ,आदि अंत जिथे संपतात ते शून्य ,सागुंच्या ह्या शून्यात सर्जनाचा एक आगळावेगळा अविष्कार आहे ,,सगुण ची माहिती त्याच्या वेब साईट वर नक्कीच मिळेल पण निर्गुण रूपातल्या सगुण ला पहायचे
असेल तर पळू लाच जावे लागेल ,कारण ते भावांकन शब्दात करण्याचे सामर्थ्य माझ्या तरी शब्दात नाही.
पाळूहून निघताना संध्याकाळ रात्रीकडे सरकत होती निसर्गाचे तेजोरूप मनातून निसटत नव्हते ,,एका निर्गुण स्वरूपी सगुण मनात रुजला होता ,त्याची अथक मेहनती वृत्ती ,आणि त्याच्या रोमारोमात प्रगट णारे निसर्गायण ,साऱ्याची रानभूल मनावरून उतरली नव्हती ,त्या वेळी सागुंची आठवण दोन ओळीत आली "दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो."
निसर्गाच्या ह्या सगुण रुपाला मैत्रयाणाचे लक्ष लक्ष अभिवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२

Wednesday, August 8, 2012

राधा कृष्णावरी भाळली

राधा कृष्णावरी भाळली
राधा आणि अमोल मला भेटलेले एक निरागस मेहूण,मेहूण हा शब्द वापरण्या इतके स्वच्छ आणि प्रसन्न आणि प्रफुल्ल.
मेहूण हा शब्द इतका भावांकित आहे कि त्याचा समानार्थी शब्द पती पत्नी ,अथवा नवरा बायको असा होऊ शकत नाही पूजेच्या दिवशी शंकर आणि पार्वतीचे अथवा लक्ष्मी नारायण स्वरूप समजून सन्मानित करून भोजनाला बोलावल्या गेलेल्या निमंत्रित जोडप्याला मेहूण म्हणतात ,त्या शब्दाची गरिमा आगळी वेगळीच आहे .
अमोल आणि राधा साधारण दोन ते तीन वर्षापूर्वी मला भेटले होते,काही कामानिमित्त्य अमोल राधा बरोबर माझ्या कडे आला होता दोघेही साधारण ४ ते पाच तास माझ्या बरोबर होते ,चिरंजीव राहुल देशपांडे च्या ओळखीने ते मला भेटले. अमोल आणि राधा प्रसन्नतेचा एक ठसा माझ्यावर उमटवून गेले ,उच्च पदस्त अमोल म्हणजे एक संस्कारित बियाणे ,ज्याच्या रोमारोमात संस्कार निथळत असतात ,राधाही तशीच ,made for इच other म्हणावे असे,सुशिक्षित संस्कार क्षम सह जीवनाचे एक चालते बोलते रूपक.
प्रेम आपुलकी आदर जिव्हाळा मराठी तल्या ह्या सर्व संस्कारक्षम शब्दांचे प्रगटीकरण करणारे ह्यांचे वर्तन मी अजूनही विसरू शकत नाही.
श्रावण महिन्यात सणावारी मेहूण बरयाच घरात पूजतात त्या आठवणीना उजाळा देणारे हे मेहूण माझ्या कायम आठवणी च्या मखरात बसलेले आहे.
शशांक रांगणेकर