Friday, November 7, 2014

सारंग भणगे

. सारंग भणगे
अखेर लिहाचे कशा साठी तर ह्या हृदयीचे त्या हृदयी जाण्यासाठी ,लेखकाचे कवीचे विचार जेव्हा शब्दांच्या माध्यमातून वाचकाकडे पोहचतात  रुजतात आणि नव  निर्मिती होते. त्यासाठी त्या शब्दात रुजण्याची एक क्षमता असावी लागते ,अथवा बुद्बुद्यान्सारखे उमटणारे शब्द कवी आणि कवितेला घेऊन बुडतात आणि त्यांचा मागमूसही राहत नाही सारंग 
भणगे एक तरुण कवी ,लेखक ,विचारवंत असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. ज्याच्या लेखनात  केवळ शब्दांची  आतिषबाजी नसून भावनांची पखरण  जागोजाग आढळते ,
अखेर शब्द म्हणजे काय केवळ स्वर आणि व्यंजनांचे वंध्या मैथुन नव्हे तर भावोनोत्सावांचे एक संस्करण आणि निर्मितीचा कुमारसंभव सागरचे लेखन हा निर्मितीचा एक सोहळाच आसतो ,त्याच्या मनातल्या भावनांना वाचकाच्या मनात उतरवून  त्यात संवेदनाची प्राण प्रतिष्ठा करणारी त्याची कविता हि आगळी वेगळीच .
त्याच्या दोन कविता वाचण्याचे सौभाग्य नुकतेच मला प्राप्त झाले ,"पांडुरंग रावो" आणि नमन
पंढरपूरचा कटेवरी कर ठेऊन उभा ठाकलेला   कानडा विठ्ठलू हे मराठी मनाचे प्राण ज्याला विठोबा माहित नाही तो मराठी नाही ,
संत वांग्मय  हि तर मराठी साहित्याची सद्सद्विवेक बुद्धीच संतानी मराठी साहित्याला दिशा दिली ,चांगले आणि वाईट ह्यातला फरक सांगितला आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग मानवी सेवेतून जातो हे दाखवले  नाम संकीर्तनातून ईश्वर  प्राप्तीचे गुज दाखवले आणि देवाला मानवी चेहरा आणि माणसाला देवत्वाची झळाळी दिली ,भक्ती मार्गातून मोक्ष प्राप्तीचे मार्ग दाखवले हीच संत परंपरा सागरच्या ह्या कवितेत दिसूनय़ेते ,संत हि प्रवृत्ती आहे नावाची लेबले फक्त आपल्या सोयीसाठी लावायची मग ते नाव तुकाराम असो अथवा सागर असो 
भाव तेच आणि सत्प्र्वृत्तीही तीच सर्व मोहातून बाहेर पडण्याची" विसरला लोभ, विसरला मोह
आनंदाचा डोह, पांडुरंग

पाहिले डोळिया, पांडुरंग रावो
आता नेत्र जाओ, मिटूनिया"  इच्छिणारी
 
संत हे कालातीत असतात कारण ती एक प्रवृत्ती आहे ती ज्याच्या मनात प्रगटते आणी लेखनात विचारात उमटते तो संत मग तुकोबान सारखा देशी वेषातला आसो कि सागर सारखा अद्यावत असो सत्प्रवृत्ती एकाच आणी त्यांचे गण गोत हि एकच . 
 
 नमन हि त्याची आणि एक कविता ,   ज्ञानाच्या  तेजो रूपाने भारावलेला कवी नमन मधून नुसता दिसताच नाही तर प्रगटतो" चिर अमरचि होतो ज्ञान ज्याला मिळे तो
परम अढळ स्थानी फक्त ज्ञानीच जातो"म्हणत ज्ञानाची महती गातो उपमा  आणी अलंकारांनी सजलेली हि सागराची कविता पंडीत कवी कालीन काव्याची आठवण करून देते 

अविरत रत अभ्यासात मेधा जयाची
दवडत क्षण नाही शारदा फक्त त्याची


ढग जल भरलेले ज्ञानवंताप्रमाणे
उचितचि उपमा ही ज्ञान पाण्याप्रमाणे
हि दोन कडवी यमक्या वामनाची आठवण ताजी करते ,
सारंगच्या  ह्या दोन कविता त्याच्या संत आणी पंडीत काव्याच्या संस्काराचे आगळे वेगळे रूप आहे ते इथेच संपत नाही ,श्रीकृष्णाच्या बालरूपाने आपल्या उघडलेल्या मुखात ब्रम्हांडाचे दर्शन यशोदेला करवले ,सागराच्या कवितेत सारंग  करवतो ,
सारंग  जे  लिहितो ते विसरता येत नाही ,त्याची आठवण मनातून जात नाही ,
शब्दशाह सारंगला   मैत्राय़ाणा चे  शब्दशः सलाम . शशांक रांगणेकर 
मुंबई 
९८२१४५८६०२

Wednesday, October 8, 2014

निशब्द देव

निशब्द देव मराठी कवितेला पडलेले एक भाव गर्भ स्वप्न,मनात आलेल्या भावनांना शब्दांचे रंगरूप देऊन रसिकांच्या मनापर्यंत पोहचविण्याचे काम हे कवीचे काम ,आणि निशब्द हा शत प्रती शत कवी आहे. अतिशय थोडक्या शब्दात जास्तीत जास्त भाव व्यक्त करणे हे उत्तम कवितेचे आदिस्वरूप.निशब्द ह्या कलेत पारंगत आहे.
जीवन चढ उतारांच्या सापशिडी च्या पटावरमुद्रांकित केलेले असते.सुख दुक्ख ,आहेरे नाहीरे ,उन्हा पाउस,जन्म मृत्यू ,अश्या अनेक उलट अर्थी शब्दांची ओळख होताच जाते ,त्यातून पाझरणारे भाव शब्दांच्या जवळपास पोहचतात पण कधीकधी ह्या दोन टोकांच्या मध्ये होणारी घुसमट मात्र निशब्द असते ,आणि देव त्या घुसमटीला अचूक शब्दांच्या पकडीत पकडतात आणि वाचका पर्यंत पोहचवतात ,जळणाऱ्या ज्वालेला शब्दात रंगवता येते पण धुमसणाऱ्या घुसमटीला शब्दांचा टाहो फोडणे फार कठीण आणि देवाच्या कवितेत नेमके तेच सामर्थ्य आहे ,निश्श्ब्द असूनही अतिशय बोलकी अशी हि देवांची बोलकी कविता केशवसुतांच्या "झपूर्झा गडे झपूर्झा"ह्या कवितेशी जवळीक साधणारी वाटते.
आभाळा एवढे दुक्ख दोन ओळीच्या कवितेत मांडण्याचे आणि त्यायोगे अनुचित राजकारणावर दोनच ओळीचे काव्य आसुडा प्रमाणे ओढणारी
त्यांची कविता जेव्हा "चांगले गुण होते पण जातीने गोंधळ केला म्हणते "तेव्हा मंडलआयोग आणि त्यानंतरचे अजूनही धुमसणारे जळीत उभे राहते.
देवांची कविता हि सर्वगामी आहे ,व्यक्ती पासून समष्टी पर्यंत पोहचणारी ,दुक्खाचे पापुद्रेन पापुद्रे सैल करणारी आणि आणि सुखकर तुझा प्रवास विठ्ठला म्हणत आध्यात्य्म्याच्या अबोल मुक्तीला स्पर्श करणारी कविता.
देवांची कविता काम क्रोध मद मोह मत्सर ह्या सर्व मानवी गुण अवगुणाचे चित्रणही फार छान करते.कारण कल्पनेचे पंख लाऊन फिरणाऱ्या ह्या कवीचे पाय मात्र वास्तवाच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत.
देवांची कविता आणि तिचा अर्थ म्हणजे सतत वाहत जाणाऱ्या आणि पात्र बदलणाऱ्या नदीचे चित्रण शब्दात न पकडता येण्या जोगे ,शब्दांच्या कवेत दुक्खला कवलानारी आणि अर्थाच्या रंगात सुखाला रंगवणारी.देवांची कविता ,निशब्द देवाची बोलाकेच नव्हे तर अबोल करणारी हि कविता एकून म्हणावसे वाटते "देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो."सूर्य किरणासारखी स्वच्छ आणि लखलखीत पसरणारी आणि आभाळ माये सारखी बरसणारी देवांची कविता आणि निशब्द देव ह्यांना मैत्रायानाचे सलाम .
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Wednesday, October 1, 2014

श्रेयस गोखले

श्रेयस गोखले
"का कशाला?कोणासाठी ?हे  आयुष्य जगायचे असते हा प्रश्न आहे एका चोवीस वर्षीय तरुणाचा ज्या वयात पाय जमिनीला लागत नाहीत त्या वयात का कशासाठी आणी कोणासाठी जगायचे हा प्रश्न ज्याला पडतो तोच जगण्याचे मोल जाणतो आणी त्यला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही सोडवतो हा माझा अनुभव आहे आणी ज्याला हे प्रश्न पडत नाही त्याला उत्तरेही सापडत नाही हाही एक अनुभव
 श्रेयस तरुण आहे ,आणी नुसताच तरुण नाही तर तारुण्य त्याच्या रगारगात सळसळते आहे ,फक्त गल्लीच्या नाक्यावर ,कॉलेज च्या क्यान्तीन मध्ये ओघळणारे हे तारुण्य नव्हे तर मला काहीतरी करायचे आहे कुच  करके दिखाना है म्हणत कोका कोल्याची जाहिरात करणारे हे वांझोटे तारुण्य नव्हे तर आस्मांको  जमिन् से  मिलाना है सांगणारे सर्जनशील तारुण्य आहे ,सर्जनशीलता हि जर तरुणाईला साथ करत नसेल तर ती तरुणाई वांझोटी ठरते आणी फक्त लोक संख्येची पूज्ये वाढवते .,पण सर्जनशीलतेचे कोंब फुटणारे काव्य करणारा एखादाच श्रेयस आयुष्याला जीवन म्हणावेसे वाटणारी वाटचाल करतो आणी ती हि चोविशीच्या उण्यापुऱ्या शिदोरीच्या जोरावर काय समजायचे लखलखीत काव्य प्रेरणा कि गत जन्माची क्यारी फॉर वर्ड  होणारी दैवी देणगी .अगम्य आणी  अतर्क्य
श्रेयस नागपूरचा आहे अगदी संत्र्यासारखा रसरशीत आणी रसाळ ,काहीच दिवसापूर्वी उर्जा नावाचा एक हवाबंद पाण्याचा प्रकार बाजारात आला आहे कदाचित श्रेयसचे ब्रांदिंग सुरु झालेले दिसतेय .
श्रेयस चे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे तो लिहितो ,कविता करतो ,चित्रपट कथा लिहितो अभिनय करतो दिग्दर्शन करतो आणी लघुका होईना चित्रपटाची निर्मितीही करतो थोडक्यात सांगायचे झाले तर निर्मितीचे कोणतेही क्षेत्र त्याच्या सुगंधी स्पर्शा  पासुन अस्पर्श राहिलेले नाही . एखादे संध्याकाळी श्रावणी पावसात खुलणाऱ्या इंद्रधनुष्या सारखे व्यक्तिमत्व सगळेच रंग तेवढेच लोभस आणी मोहक
श्रेयस लघु पट निर्मिती करतो आहे ,श्रेयस च्या व्यक्तीमत्वाची सर्व बिरूद मिरवणारी हि निर्मिती आपल्या सगळ्यांच्या पसंतीस पुरेपूर उतरेल ह्या बद्दल शंकाच नाही ।
श्रेयसचे हे द्वैदिप्यमान स्वयम्प्रकाशीत व्यक्तिमत्व पाहतानाच ओठांवर नकळत ओळी येतात "गगनी उगवला सायंतारा "
श्रेयसच्या क्यालीडोस्कोपिक व्यक्तिमत्वाला  मैत्रायानाच्या असंख्य शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२


 
 

"मैत्रायण"
प्रिय जनहो
आयुष्यात चांगली माणसे भेटणे हा दैव(देव)योगच म्हणायचा,त्या देव योगाने आयुष्य संपन्न होत आलाय,"अंनंत हस्ते कमलाकराने ,देता किती घेशील दो कराने"हे नक्षत्रंचे देणे सांभाळून तरी कसे ठेवायचे आणि कुठे ,अमृतात पैजा जिंके अश्या माय बोलीचाच आसरा ,,मला भेटलेल्या ह्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण असमान्यात्वाची अदृश्य कवच कुंडले धारण करणाऱ्या ह्या मित्रांची मी रेखाटलेली वेडी वाकडी काहोईना चित्रे
तुमच्या पुढे सादर करण्याची मनोमन इच्छा ,साधन "मैत्रायण ""अपुरी शब्दसंपत्ती आणि अपुऱ्या प्रतिभेचा वारसा घेऊन येणाऱ्या ह्या संकल्पनेला फक्त तुमच्याच प्रेमाचा बुडत्याला काडी सारखा वाटणारा आधार ,तुमचा वाचनीय पाठींबा सदैव असो द्यावा .जिथे पु.ल.सारखी दैवत जन्माला येतात तिथल्या मातीलाही फुलांचा वास येतो हेच खरे,मग ते कोर्हन्तीचा का असेना ,मी अभिमानाने सांगतो कि मी पार्ल्याचा आहे ज्या पार्ल्याचे नाव पु ल.नि अजरामर केले ,माणसांनी माणसाचे देव गुण वर्णावे हा त्यांनी दिलेला वारसा ,त्याची जपणूक करण्याची केलेली एक केविलवाणी का होईना धडपड ,,"मैत्रायण"
शशांक रांगणेकर

Friday, August 8, 2014

देव टाक्यांचे पाणी


प्रिय जनहो ,mitrancheramayan.blogspot.com
आज. आपण सर्व  एका जण सुख सोहळ्याला  जमलो आहोत ,आणी AASTRID   माझ्या सर्व सहकाऱ्यांनी  ह्याचे आयोजन केले आहेत हि एक विशेष बाब आहे .  विशेष म्हणायचे ह्या साठी कि ह्या सुख सोहळ्याची जराही कुणकुण   उत्सव मूर्तीला    लागू देता हा आनंदोत्सव संपन्न होत आहे आणि आस्त्रीद च्या दृष्टीने हि आश्चर्यजनक बाब आहे,कारण पारदर्शी व्यवहार हे जणू ह्यांचे बोध वाक्यच आहे आणी यशाचे गमक ही
एक म्हण आहे कि उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि  कनिष्ट नोकरी ,काही वर्ष पूर्वी आपला मराठी समाज हे विसरला आणी तेव्हाची आमची तरुणाई नोकरीच्या मागे लागली ,आणि समाजाच्या तरुण कर्तृत्वाला नोकरी पेशा आवडू लागला ,बाबू बनून खाबु व्हायची स्वप्न मराठी तरुणाईला दिवसा उजेडी पडू  लागली ,ह्या स्वप्नांनीच मर्द मराठ्याला कारकुनी  पेशात जोखडले आणी कारकुनाची एक पलटण व्यापार उदीम करणाऱ्या धाडसी  तरुणांना वेडगळ आणी अविचारी समजू लागली ,महाराष्ट्रातल्या उद्यमी वृत्तीला जणू एक ग्रहणाच  लागू पाहत होते
तुकोबांच्या एका अभंगात तुकोबा म्हणतात "मेळवोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे  वेच करी " चांगल्या व्यवहारांनी धन संचय करणे आणी " आणी कुठलाही लोभ  न करता व्यय करणे हा एक पुरषार्थ च आहे
स्वच्छ  आणि पारदर्शी  ह्या शब्दांना  व्यापारी  शब्द कोशात जणू जागाच नसते असा तक सार्वत्रिक गैर समज आहे  ,पण तुकोबांनी सांगितल्या प्रमाणे स्वच्छ आणि सचोटीने व्यापार करता येतो हे ज्या व्यापाऱ्यांनी दाखवून दिले त्या त आस्त्रीद कंपनी अग्रगण्य आहे .
ज़े पेराल ते उगवेल हाच निसर्गाचा न्याय आहे आणि तो सगळी कडे लागू होतो. सचोटीने केलेला व्यापार चांगलीच फळे देतो. आणि  हे शिकाव कोणाकडून तर आजच्या उत्सवमूर्ती कडून अथक परिश्रमाने ह्या तरुणाने एका व्यापारी संस्थेचे बीजारोपण केले  आणि त्याचा वेलू गगनंतरी पोहचला  आहे . श्री रवींद्र जगताप जे ह्या कंपनीचे नेतृत्व करतात त्यांच्या यशाचा आलेख थक्क करणारा आहे ह्या यशाची गुरुकिल्ली कोणती ,अनेक उत्तर येतील कोणी म्हणेल,नशीब,कोणी चलाखी म्हणेल काही नात्य्गोत्या चा विचार करतील  पण खरे कारण आहे तुकोबांच्या अभंगाचे तंतो तंत पालन
 आमच्या पंतप्रधानांनी एक नारा  दिला "सब कि साथ सबका विकास "पण हा संदेश जगताप साहेबांनी फार सुरवातीपासूनच अमलात आणला आपल्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी हा आस्त्रीद चा डाव मांडला आणि यशस्वीही केला सर्वश्री आशिष गिरप,सुबोध घैसास आणि गणेश केळकर ह्या आपल्या विश्वासू  सहकार्यांनी त्यांना मोलाची साथ दिली आणि अजूनही देताहेत ,ह्या कालखंडात बरेच लोक आलेही आणि गेलेही किंबहुना वैचारिक मतभेदाच्या नावाखाली त्यांना जावेही लागले ,असो पण जगताप साहेब मात्र  आपल्या वैचारिक मूल्यांपासून कधीही ढळले नाहीत आणि आपल्या स्वछ  आणि पारदर्शी व्यवहाराला विसरले नाहीत  त्यांच्या यशाचे गमक हेच.
वर्षे  त्याचे क्लीयारिंग  चे काम  आमच्याकडे होते ,आम्हा दोघाच्याही  व्यावसायिक जीवनातला तो एक सुवर्ण  काल होता ,बऱ्याचश्या  अविस्मरणीय  आठवणींच्या उबदार रमल खुणा सोडून वाटा वेगळ्या झाल्या पण मने नाहीत आयुष्यात ज्या मुल्यांची जपणूक आपण करतो त्या जपणारा दुसरा माणूस जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा वाटते जितं मया ,कारण ज्या विचारांना मी जपले ती जपान्यायोग्याच होती आहेत आणि भविष्यातही राहतील कारण सत्प्रवृत्ती हि काही कोणाची मिरासदारी आसत नाही आणि संपतही नाही गंगेच्या ओघा प्रमाणे ती सतत   राहील   आयुष्याच्या संध्याकाळी शांत पणे विचार करताना एक विचार मनाच्या पडद्यावर नकळत येतो कि जगताप साहेबांसारखे व्यक्तिमत्व तुला भेटले काही काळ तुम्ही बरोबर होतात काही कालच का असेना तुझे आयुष्य सोन्याचे झाले हे हि नसे  थोडके केवळ आणि केवळ वायानेच मोठा असल्याने प्राप्त झालेल्या निसर्गदत्त अधिकारांचे स्मरण करून आशीर्वाद देतो कि "जीवेत शरदः शतम"देव टाक्याच्या पाण्या सारखे स्वच्छ आणि निर्मळ मन असणाऱ्या ह्या माणसाला परमेश्वर उदंड  आणि निरोगी आयुष्य देवो हि प्रभू चरणी प्रार्थना करू माझे भाषण संपवतो .