Thursday, January 12, 2012

तुझा विसर न व्हावा "

"तुझा विसर न व्हावा "

स्मृतिचित्रे ,मराठी साहित्यातील एक अद्भुत कलाकृती ,सकस आणि कसदार साहित्याला स्वानुभवाच्या वेंनाच जन्माला घालू शकतात ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे "संपूर्ण स्मृति चित्रे ,आचार्य अत्र्यांनी

लक्ष्मि बाई टिळकांचा साहित्य लक्ष्मी  म्हणून यथोचित गौरव केला आहे ,मागील अर्ध शतकाचा सामाजिक इतिहास ह्या ग्रंथात उलगडला गेला आहे ,प्रतिकूल परिस्तिथी ने कुठल्याही शाळेत न गेलेल्या

ह्या साहित्य लक्ष्मिने आपल्या संवेदना शील मनाचे बोल इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत मांडले आहेत त्याला मराठी साहित्यात तोड नाही,"सत्य हे कल्पने पेक्षा अधिक बोधक आणि रम्य असते

,म्हणूनच विस्मृतीच्या पडद्या आड ते कधीही पुसले जात नाही ,मराठी माणूस ,आणि साहित्य ह्या साहित्य लक्ष्मि ला कधीही विसरू शकणार नाही ,मराठी साहित्यातला हा एक मैलाचा दगड,ह्या साहित्य लक्ष्मिचे

पुण्या स्मरण करताना म्हणावेसे वाटते कि "तुझा विसर न व्हावा "

शशांक रांगणेकर