Wednesday, October 8, 2014

निशब्द देव

निशब्द देव मराठी कवितेला पडलेले एक भाव गर्भ स्वप्न,मनात आलेल्या भावनांना शब्दांचे रंगरूप देऊन रसिकांच्या मनापर्यंत पोहचविण्याचे काम हे कवीचे काम ,आणि निशब्द हा शत प्रती शत कवी आहे. अतिशय थोडक्या शब्दात जास्तीत जास्त भाव व्यक्त करणे हे उत्तम कवितेचे आदिस्वरूप.निशब्द ह्या कलेत पारंगत आहे.
जीवन चढ उतारांच्या सापशिडी च्या पटावरमुद्रांकित केलेले असते.सुख दुक्ख ,आहेरे नाहीरे ,उन्हा पाउस,जन्म मृत्यू ,अश्या अनेक उलट अर्थी शब्दांची ओळख होताच जाते ,त्यातून पाझरणारे भाव शब्दांच्या जवळपास पोहचतात पण कधीकधी ह्या दोन टोकांच्या मध्ये होणारी घुसमट मात्र निशब्द असते ,आणि देव त्या घुसमटीला अचूक शब्दांच्या पकडीत पकडतात आणि वाचका पर्यंत पोहचवतात ,जळणाऱ्या ज्वालेला शब्दात रंगवता येते पण धुमसणाऱ्या घुसमटीला शब्दांचा टाहो फोडणे फार कठीण आणि देवाच्या कवितेत नेमके तेच सामर्थ्य आहे ,निश्श्ब्द असूनही अतिशय बोलकी अशी हि देवांची बोलकी कविता केशवसुतांच्या "झपूर्झा गडे झपूर्झा"ह्या कवितेशी जवळीक साधणारी वाटते.
आभाळा एवढे दुक्ख दोन ओळीच्या कवितेत मांडण्याचे आणि त्यायोगे अनुचित राजकारणावर दोनच ओळीचे काव्य आसुडा प्रमाणे ओढणारी
त्यांची कविता जेव्हा "चांगले गुण होते पण जातीने गोंधळ केला म्हणते "तेव्हा मंडलआयोग आणि त्यानंतरचे अजूनही धुमसणारे जळीत उभे राहते.
देवांची कविता हि सर्वगामी आहे ,व्यक्ती पासून समष्टी पर्यंत पोहचणारी ,दुक्खाचे पापुद्रेन पापुद्रे सैल करणारी आणि आणि सुखकर तुझा प्रवास विठ्ठला म्हणत आध्यात्य्म्याच्या अबोल मुक्तीला स्पर्श करणारी कविता.
देवांची कविता काम क्रोध मद मोह मत्सर ह्या सर्व मानवी गुण अवगुणाचे चित्रणही फार छान करते.कारण कल्पनेचे पंख लाऊन फिरणाऱ्या ह्या कवीचे पाय मात्र वास्तवाच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत.
देवांची कविता आणि तिचा अर्थ म्हणजे सतत वाहत जाणाऱ्या आणि पात्र बदलणाऱ्या नदीचे चित्रण शब्दात न पकडता येण्या जोगे ,शब्दांच्या कवेत दुक्खला कवलानारी आणि अर्थाच्या रंगात सुखाला रंगवणारी.देवांची कविता ,निशब्द देवाची बोलाकेच नव्हे तर अबोल करणारी हि कविता एकून म्हणावसे वाटते "देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो."सूर्य किरणासारखी स्वच्छ आणि लखलखीत पसरणारी आणि आभाळ माये सारखी बरसणारी देवांची कविता आणि निशब्द देव ह्यांना मैत्रायानाचे सलाम .
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Wednesday, October 1, 2014

श्रेयस गोखले

श्रेयस गोखले
"का कशाला?कोणासाठी ?हे  आयुष्य जगायचे असते हा प्रश्न आहे एका चोवीस वर्षीय तरुणाचा ज्या वयात पाय जमिनीला लागत नाहीत त्या वयात का कशासाठी आणी कोणासाठी जगायचे हा प्रश्न ज्याला पडतो तोच जगण्याचे मोल जाणतो आणी त्यला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही सोडवतो हा माझा अनुभव आहे आणी ज्याला हे प्रश्न पडत नाही त्याला उत्तरेही सापडत नाही हाही एक अनुभव
 श्रेयस तरुण आहे ,आणी नुसताच तरुण नाही तर तारुण्य त्याच्या रगारगात सळसळते आहे ,फक्त गल्लीच्या नाक्यावर ,कॉलेज च्या क्यान्तीन मध्ये ओघळणारे हे तारुण्य नव्हे तर मला काहीतरी करायचे आहे कुच  करके दिखाना है म्हणत कोका कोल्याची जाहिरात करणारे हे वांझोटे तारुण्य नव्हे तर आस्मांको  जमिन् से  मिलाना है सांगणारे सर्जनशील तारुण्य आहे ,सर्जनशीलता हि जर तरुणाईला साथ करत नसेल तर ती तरुणाई वांझोटी ठरते आणी फक्त लोक संख्येची पूज्ये वाढवते .,पण सर्जनशीलतेचे कोंब फुटणारे काव्य करणारा एखादाच श्रेयस आयुष्याला जीवन म्हणावेसे वाटणारी वाटचाल करतो आणी ती हि चोविशीच्या उण्यापुऱ्या शिदोरीच्या जोरावर काय समजायचे लखलखीत काव्य प्रेरणा कि गत जन्माची क्यारी फॉर वर्ड  होणारी दैवी देणगी .अगम्य आणी  अतर्क्य
श्रेयस नागपूरचा आहे अगदी संत्र्यासारखा रसरशीत आणी रसाळ ,काहीच दिवसापूर्वी उर्जा नावाचा एक हवाबंद पाण्याचा प्रकार बाजारात आला आहे कदाचित श्रेयसचे ब्रांदिंग सुरु झालेले दिसतेय .
श्रेयस चे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे तो लिहितो ,कविता करतो ,चित्रपट कथा लिहितो अभिनय करतो दिग्दर्शन करतो आणी लघुका होईना चित्रपटाची निर्मितीही करतो थोडक्यात सांगायचे झाले तर निर्मितीचे कोणतेही क्षेत्र त्याच्या सुगंधी स्पर्शा  पासुन अस्पर्श राहिलेले नाही . एखादे संध्याकाळी श्रावणी पावसात खुलणाऱ्या इंद्रधनुष्या सारखे व्यक्तिमत्व सगळेच रंग तेवढेच लोभस आणी मोहक
श्रेयस लघु पट निर्मिती करतो आहे ,श्रेयस च्या व्यक्तीमत्वाची सर्व बिरूद मिरवणारी हि निर्मिती आपल्या सगळ्यांच्या पसंतीस पुरेपूर उतरेल ह्या बद्दल शंकाच नाही ।
श्रेयसचे हे द्वैदिप्यमान स्वयम्प्रकाशीत व्यक्तिमत्व पाहतानाच ओठांवर नकळत ओळी येतात "गगनी उगवला सायंतारा "
श्रेयसच्या क्यालीडोस्कोपिक व्यक्तिमत्वाला  मैत्रायानाच्या असंख्य शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२


 
 

"मैत्रायण"
प्रिय जनहो
आयुष्यात चांगली माणसे भेटणे हा दैव(देव)योगच म्हणायचा,त्या देव योगाने आयुष्य संपन्न होत आलाय,"अंनंत हस्ते कमलाकराने ,देता किती घेशील दो कराने"हे नक्षत्रंचे देणे सांभाळून तरी कसे ठेवायचे आणि कुठे ,अमृतात पैजा जिंके अश्या माय बोलीचाच आसरा ,,मला भेटलेल्या ह्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण असमान्यात्वाची अदृश्य कवच कुंडले धारण करणाऱ्या ह्या मित्रांची मी रेखाटलेली वेडी वाकडी काहोईना चित्रे
तुमच्या पुढे सादर करण्याची मनोमन इच्छा ,साधन "मैत्रायण ""अपुरी शब्दसंपत्ती आणि अपुऱ्या प्रतिभेचा वारसा घेऊन येणाऱ्या ह्या संकल्पनेला फक्त तुमच्याच प्रेमाचा बुडत्याला काडी सारखा वाटणारा आधार ,तुमचा वाचनीय पाठींबा सदैव असो द्यावा .जिथे पु.ल.सारखी दैवत जन्माला येतात तिथल्या मातीलाही फुलांचा वास येतो हेच खरे,मग ते कोर्हन्तीचा का असेना ,मी अभिमानाने सांगतो कि मी पार्ल्याचा आहे ज्या पार्ल्याचे नाव पु ल.नि अजरामर केले ,माणसांनी माणसाचे देव गुण वर्णावे हा त्यांनी दिलेला वारसा ,त्याची जपणूक करण्याची केलेली एक केविलवाणी का होईना धडपड ,,"मैत्रायण"
शशांक रांगणेकर