Wednesday, May 30, 2012

प्रसाद नामदेव चव्हाण

प्रसाद नामदेव चव्हाण
काही काही भेटी ह्या आयुष्यात ,योगायोगानेच होतात ,आणि ते योगायोग आयुष्यात बरचसे काही तरी देऊन जातात.नशीब माझ्यावर मेहरबान आहे ह्या बद्दल काही शंकाच नाही.नाहीतर माझ्या सारख्या अत्यंत सामान्य आणि सुमार माणसाला एवढी चांगली माणसे मित्र म्हणून का मिळवीत.उत्तर एकाच "खुदा देता है तो छप्पर फाडके देता है "मित्र म्हणून मला मिळालेल्या ह्या असंख्य व्यक्तींचे ऋण विसरावे म्हंटले तरी विसरू शकत नाही एवढे मोठे.त्यांच्या सुहृदतेचा झालेला सुवर्ण स्पर्श कायमचा ठसा उमटवणारा.

माझ्या मित्रपरिवारात मला काका म्हणून ओळखतात .पण वागतात जिवलग मित्रा सारखे. आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या आयुष्यातली नवी कोवळी उन्हे माझ्याशी शेअर करणारी हे तरुण वयातल्या अंतराचे भान दाखवत नाही पण विसरत हि नाहीत ,मैत्री आणि आदर एक सुरेख चित्रण ह्यांच्या वर्तनात नेहमीच जाणवते .नव्या पिढीचा मी शतशः ऋणी आहे.ह्या मित्रांच्या नामावलीतले एक तारांकित नाव "प्रसाद नामदेव चव्हाण ".

दुर्गा सखा संस्थेचा एक खंदा कार्यकर्ता ,आणि आमच्या मनूचा भाऊ ,चुलत भाऊ म्हणत नाही कारण प्रेम सख्या भावान पेक्ष्याही जास्त.नाते काय असावे किती असावे आणि कसे असावे ह्या सर्व ककारांचे समर्पक उत्तर .मनु दादा आणि प्रसाद म्हणजे आजचे राम लक्षमण ,दादाचे प्रसाद वरचे प्रेम आणि प्रसादला असलेला दादाचा अभिमान ह्याचे मनोहारी चित्रण नेहमीच दिसते.
प्रसाद हा उत्तम छाया चित्रण करतो ,छायाचित्रण चव्हाणांच्या रक्तातच आहे.पण प्रसाद नुसताच फोटो काढत नाही तर ते सजीवही करतोअशी ह्याची छायाचीत्रणे आहेत .
आजची पिढी काहीच वाचत नाही सुसंस्कृत नाही ह्या आक्षेपाचे उत्तर म्हणजे प्रसाद.साहित्य कविता इतिहास ,संत साहित्याचा अभ्यास ह्या सर्व अलंकाराने सालंकृत असलेले प्रसादचे व्यक्तिमत्व फारच लोभस आहे.
प्रसाद ची माझी भेट नुकतीच झाली आदिवासी पाड्याला जाताना तो आमच्या बरोबर होता खरे म्हणाल तर आम्ही त्याच्या बरोबर होतो ,निसर्गाचे अनादी आणि अनंत रूप आपल्या तृतीय नेत्रात तो सामावून घेत होता त्याच्या छाया चित्रणाची पोत काही वेगळीच निसर्गाशी जिवंत जवळीक साधणारी.एक प्रगल्भ कलाकारीची जाण असलेली .लहान वयातही मनाचा मोठेपणा दाखवणारी.पण तरीही तरल आणि सुगम.
आयुष्याचा सारीपाट खेळताना पडणारे प्रत्येक दान उजवच असेल असे नाही हे ज्याला उमगले तोच खरा ज्ञाता आणि जेता हि .प्रसाद मध्ये ह्या प्रासादिक गुणांना मैत्रयाणाच्या हार्दिक शुभेच्छा.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२

Friday, May 25, 2012

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी

नाद स्वर आणि सूर ,शब्द ,परमेश्वरा ने माणसालानव्हे तर संपूर्ण जीव सृष्ठीला दिलेली एक अलोकिक देणगी ,आणि ह्या देणगीची आराधना किंवा उपासना करणारे कलाकार मग ते गायक असोत ,वादक असोत अथवा कवी किंवा चित्रकार ,सर्व परमेश्वराचे प्रेषित ,त्या प्रेषितांचे ह्या भू तलावारचे अस्तित्व हि ईश्वराच्या अस्तित्वाची जिवंत ओळख.नाद ब्राम्हची उपासना हे ईश्वरी उपासनेचे अनन्य रूप .
शब्द आणि सुरांबरोबर ताल नाद नसतील तर तर गायन अगदीच फिके वाटते ,गाण्या बरोबर तबला पेटीची साथ नसणे म्हणजे हळदी कुंकवा शिवायची सवाष्ण .शब्द आणि सुरांबरोबर गाण्यात पेटी आणि तबल्याचे मेहुण पाहिजेच पाहिजे आणि त्रिताल झपताल ह्यांची साथ नसेल तर सगळेच बेचव आणि अळणी.
कोंकण म्हणजे परशुराम भूमी ,तेज आणि रूप ह्याचे मनमोहक चित्रण कोंकण वासीयांच्या चित्रित होतेच.रूप तेज आणि गुणाचे संचित साथीला घेऊन येणारे एक गुणी व्यक्तिमत्व ."प्रसाद विलास पाध्ये
".प्रसाद एक तबला नवाझ आहे .नवाझ म्हणजे राजकुमार ,खरोखर राजकुमाराच सगळ्या गायकांना हवाहवासा वाटणारा,उदार दिलदार आणि आश्वासक. गायकाला साथ करताना स्वतःचे अस्तित्व दाखवत त्याच्या गाण्याला सांभाळणारा एक मित्र.
बऱ्याच वेळेला स्वतःचे मोठेपण गायकांना त्यांच्या कमजोर गायकीच्या कैचीत पकडून दाखवण्याची फार हौस असते पण प्रसाद नावाप्रमाणेच आहे सह कलाकाराला साथ करणारा एक ईश्वरीय प्रसाद भासणारा.मी ह्याला फाडला किंवा भाजून खाल्ला असा कधीही विचार न करणारा .
iit बुद्धिवंत आणि प्रज्ञावंत विध्यार्थ्यांचे माहेर घर.जणू विज्ञान आणि प्रज्ञा साठी साथीने पाणी भरतात.पवई येथील iit मध्ये प्रसाद तबला शिकवतो .कला आणि विज्ञानाचे मनोहर फ्युजन प्रसादने ह्या लहान वयातही अनेक दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे .
पद्मजा फेणाणी ,अश्विनी भिडे,स्वीकार कट्टी पंडित उल्लाहास बापट ,श्रीरंग भावे सारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे.
गुणाचे भांडार ,बोटांवर जणू प्रत्यक्ष शिव शंकराने . दिलेले नाद ब्रम्हाचे वरदान ,आणि रूप तर "रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असे उद्गार आणणारे ,तरीही चेहऱ्यावर निरहंकारी प्रासादिकता विलसणारे भाव. हे तर खरोखरीचे नाक्षत्रांचेच देणे .
प्रसाद च्या वाल वर त्याचे अनेक फोटो लावलेले आहेत आणि काही निसर्ग चित्र णे हि लावलेली आहेत ,त्यातले एक छायाचित्रण आहे हिमालयातल्या डोंगर दरयांचे,आणि त्या पार्श्वभूमीवर उभारलेला प्रसाद ,मनात विचार बळावतात नाद्ब्राम्हचे रूप हि असेच असेल ना पाठच्या वृक्ष राजी सारखेच उत्तुंग आणि मनोहारी अगदी पाध्यांच्या प्रसाद सारखे.
प्रसाद कोकणचा आहे तिथल्या हापूस सारखाच गोड फक्त गोड नव्हे तर स्वताची एक वेगळीच चव सांगणारा अनोखी आणि आगळी वेगळीच शब्दही अपुरे पडणारी.
त्याच्या तबल्याचा नाद ऐकून म्हणावसे वाटते "आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा तबला वाजवतो "
रूप आणि गुणाचे मनोहारी संचित घेऊन आलेल्या ह्या नादब्रम्ह उपासकाला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर


मुंबई ९८२१४५८६०२

Wednesday, May 16, 2012

दिनेश पवार


दिनेश पवार
जीवन जगायची धारणा जो देतो तो धर्म,धर्माची हि व्याख्या सांगणारा एक धार्मिक मला फेस बुक वर सापडला ,आपल्या मनोगतात धर्म आणि त्या बद्दल आपले सुस्पष्ट विचार शब्दांकित करणारा एक युवक ,पशु पक्ष्यांवर मनापासून प्रेम करणारा एक पक्षीप्रेमी,
धर्म आणि जाती ह्यांच्यावर आधारित समाजकारण आणि राजकारण महाराष्ट्र भूमीत कधीच रुजले नाही
महाराष्ट्र भूमीचा धर्म सर्व जाती पंथ ह्यांना एकत्र ठेवणारा धर्म होता आणि आहे ,ज्ञानेश्वर ,तुकाराम नामदेव सावतामाळी ह्यांनी रुजवलेला वाढवलेला धर्म आहे. त्या धर्माचे नाव मानवता.मराठी साहित्यालाही धर्माचे वावडे नाही ,मुस्लीम धर्मीय संत कवी ,मराठीतले ख्रिस्त पुराण हि हि  मराठीची लाडकी अपत्ये.
शिवाजी हा महाराष्ट्राचा राजा होता ,महाराष्ट्रातल्या मुस्लीम बंधावानाही तो तितकाच प्रिय होता आणि आहे कारण शिवरायाच्या राजकारणाला जातीय अथवा धर्मांध राजकारणाचा रंग नव्हता त्याचा रंग भगवा होता एक शुचितेचा रंग ,विरक्तीचा रंग ,राजा हा जगाचा उपभोग शून्य स्वामी असतो ह्या तत्वांवर नितांत विश्वास असणारा राजा होता सर्व प्रजा हि समान लेकारासारखी असे समजणारा एक कुटुंब प्रमुख ,हा आपला तो परका अशी वृत्ती राजांच्या ठाई
नव्हती .जाती आणि धर्मापासून दूर राहणारे आणि सर्वांनाच सामावून घेणारे त्यांचे राजकारण होते ,म्हणूनच तत्कालीन समाजात सर्व जाती धर्मात शिवाजी राजे आमचा शिवाजी म्हणून लोकप्रिय होते मानवता ह्या एकाच तत्वावर शिवरायाचे राजकारण आधारित होते आणि त्यामुळेच त्यांची लोकप्रियता आजही सर्व धर्मीय जनमानसात टिकून आहे. धर्मांधतेची विषवल्ली ह्या मातीत कधीही रुजली नाही आणि रुजणार हि नाही.
इतिहासाची पुनरावृत्ती होते ,शाहीर अमर शेख ह्यांच्या सुकन्या सुश्री प्रेरणा अमरशेख ह्या आमच्या पार्ले महाविद्यालयात शिकत होत्या , फॉर्म भरताना जात आणि धर्म ह्या सदराखाली घातलेला "मानवता"हा शब्द बदलण्यास त्यांनी नकार दिला होता. गीता रहस्य लिहिणारे बाल गंगाधर टिळक तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी म्हणून "लोकमान्य "होते .मानवतेचा मळवट भरलेले राजकारण आणि समाजकारण हीच मराठी माणसाची खरी ओळख .आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एक मराठी युवक जो फार तर २४ /२५ वर्षाचा असेल तो ह्या तत्वज्ञानाचे समर्थन करतो आहे. दिनेश तुझ्या सारख्या तरुणांच्या हातातच महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे मी दिनेश पवार ह्या व्यक्तीला व्यक्तीशः ओळखत नाही पण माझ्या ओळीखिचा आहे त्याचा मानव धर्म ,पशु पक्ष्यांवरचे त्याचे प्रेम ,उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा म्हणून मनाला भिजवणारी हाक,आणि केवळ मनुष्य जातीवर नव्हे तर तुमच्या बरोबर ह्या वसुंधरेवर सह प्रवासी म्हणून आलेल्या सर्व सजीवांवर प्रेम करा आणि त्यांचाही जगण्याचा हक्क मान्य करा म्हणून केलेली एक कळकळीची विनंती.
दिनेश हे सूर्याचे नाव आहे अंधार संपतो प्रकाशाचे राज्य चालू होते समाजाच्या ,मनातला अंधार संपायला मानवतेचे प्रकाश किरण उगवावे लागतात ,आपल्या नावाला साजेसे काम करणाऱ्या दिनेश पवारला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर


Thursday, May 10, 2012

विशाल महामुनी

रोहन मंकणी पुण्यातला मनसेचा एक युवा नेता ,
महाराष्ट्रातल्या आगामी राजकारणातला एक विन चा घोडा ,एक धडाडीचा युवा नेता ८०%समाज कारण आणि २०%राजकारण हि त्याच्या राजकारण करण्याची पद्दाथ असावी.
रोहन मधला सर्वात मोठा गुण म्हणजे आपल्या बरोबर कार्य कर्त्यांना तो सामील करून घेतो .हा कार्यकर्त्यांचा सहभाग रोहन आणि त्याच्या कार्यकर्त्यांना समाज सेवेचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देत आहे ,गोवर्धन उचलायलाही कृष्णाने आपल्या सर्व गोपाल मित्रानाही सहभागी करून घेतले होते ,रोहनच्या राजकारणाचा बाज नेमका हाच आहे त्याचे राजकारण भाच्या पुताण्याचे नाही तर "महाराष्ट्र धर्म वाढवावा "ह्या साथ संगतीवर चालणारे राजकारण आहे. भविष्यातल्या पुण्याच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण करण्याची ती नांदी आहे .

नेत्याचे बळ त्यांच्या कार्यकर्त्यात असते हे महाराष्ट्रातले राजकारणी विसरले असावेत ,नाहीतर इम्पोर्टेड नेतृत्व आणि प्रादेशिक नेतृत्व असा कलगीतुरा नाचला नसता ,पण मला वाटते कि महाराष्ट्राच्या मातीत रुजणारे नेतृत्व उदयाला येते आहे आजची तरुणाई ह्या ८०"समाजकारण अनि२०%राजकारण करणाऱ्या ह्या नवी न युवा नेतृत्वाला पाठबळ देते आहे अगदी मनापासून साथ देताहेत .रोहन चा एक साथी "विशाल महामुनी"

नाव किती काव्यमय आहे न ,विशाल महामुनी "नावात काय आहे म्हणतात पण मला वाटते कधी कधी नियती नावातच सर्व काही ठेवते ,
विशाल हा ग्राफिक वेब डिझाय न र आहे ,तो त्याचा व्यवसाय आहे ,पण तो एक उत्तम छायाचित्रकारही आहे आणि तो त्याचा आवडता छंद आहे ,उत्तम छायाचित्रण हे मनाच्या संवेदन शिलतेचे द्योतक असते ,कुठे काय आणि केव्हा ,कसे अश्या क करांची छायाचित्रणात जाण आवश्यक असते ,ह्या लहान वयातही उत्तम छायाचित्रण करणे हा अनुभवाचा नव्हे तर भाग्याचाच भाग समजावा लागेल ,इतकी उत्तम छाया चित्रण कला त्याला अवगत आहे ,.
पुणे हि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ,विशाल सर्व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी असतो ,,
पुण्याचा विकास सर्वांगाने व्हावा आणि त्यात आपला सहभाग असावा अशी मनापासून स्वप्ना पाहणाऱ्या आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या युवकाची एक फळी उभिकारणाऱ्या रोहन चा विशाल बिनीचा शिलेदार आहे ,,रोहन विशाल सारखे तरुण जेव्हा आपल्या सर्व साथीदारांबरोबर मनापासून काम करतात तेव्हा विकासाची गंगा अवतीर्ण व्हायला वेळ लागत नाही ,"महाराष्ट्राला "महा राष्ट्र"करण्याचे स्वप्ना पाहणाऱ्या "रोहन विशाल आणि त्याच्या असंख्य सोबत्यांना मैत्रायाणाचा सलाम
शशांक रांगणेकर

Wednesday, May 2, 2012

प्रतिक म्हात्रे

निर्मल आणि निर्वाज्य हास्य हि निरोगी मनाची देणगी असते आणि निरोगी मन हि परमेश्वराची देणगी ,हि देणगी मिळालेला एक भाग्यवंत मला भेटला हाही भाग्याचाच भाग पण माझ्या .नाव "प्रतिक म्हात्रे"
हसताना दिलखुलास हसले तर कदाचित पोलीस पकडतील असे भाव मनात बाळगून हसणारे चेहरे मी बरेच बघितले आहेत पण काहीही हाताचे नठेवता जे हसरे चेहरे दिसतात त्यातला हा एक चेहरा .
मुखवटा धारण न करता मनापासून हसणारी माणसे खर्या अर्थाने परमेश्वराचे प्रेषित असतात ,त्याच्या कृपेचासंदेश  ते जगात पसरवतात ,
नियती नियतीचे काम करते पण परमेश्वर नियती कडे लढण्याचे बळ देतो ,ऐन शिक्षण काळात पित्याचे छात्र हिरवल्यानंतरही शिक्षण पूर्ण करून ,चांगली नोकरी हस्तगत करून लहान भावावर आणि कुटुंबावर आपल्या प्रेमाचे छत्र पसरवणे आणि तेही कोवळ्या वयात हे सोपे काम नाही ,आणि नियतीशी झगडता झगडता चेहऱ्यावर जराही कटुता न आणता सदैव स्मिताचे शरदाचे चांदणे फुलवणे ज्यांना जमते ते परमेश्वराच्या कृपेचे जिते जागते प्रतिक.
प्रतिक हा एका फायनान्स कंपनीत नोकरी करतो पण बाकी व्यवहारात मात्र जराही वाणिज्य वृत्ती नाही ,,दिलदार हसमुख आणि जीव भावाचा मित्र अशी त्याची छबी त्यच्या मित्रात उमटलेली आहे .
स्वतः सठी सुखाचे मार्ग शोधतो तो भोगी ,आणि दुसरयासाठी सुख शोधतो तो योगी ,मित्रांच्या प्रीयाजनाच्या सुखासाठी सदैव काही न काही कार्यमग्न राहावे हि ह्याची मनापासूनची ओढ ,.

प्रतिक खरा रसिक आहे मराठी नाटके चित्रपट पाहणे पुस्तके वाचणे ह्याची ह्याला आवड आहे .सापताहिक मासिके ह्यांच्या साठी लिखाण करणे आणि त्या dware मराठी प्रतिभावंत युवकाची ओळख करून देण्याची ह्यची एक अनोखी शैली युवा जगतात लोकप्रिय आहे आहे .
दुख्हाचे काळे शारढग पसरलेले असताही चेहऱ्यावर आनंदाचे शरद चांदणे फुलवणारा आणि दुसऱ्यान साठी सुखाचा मार्ग शोधणारा प्रतिक आणि त्याच्या चेहऱ्यावरचे चांदणे हि सुखाची अनुभूती.
कविता करतोस का ह्या माझ्या प्रश्नाला त्याचे उत्तर मला कविता जमत नाही ,ज्याचे आयुष्याच एक काव्य आहे त्याला वेगळी कविता ती कशाला पाहिजे दुक्खाच्या प्राहारा नंतरही ,सुखाचे सुरेल गाणे गाणारा प्रतिक हेपरमेश्वरी कृपेचे चालते बोलते प्रतिक .त्या प्रतीकला मैत्रायानाच्या अनेक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२