ऋग्वेदातल्या ऋचा
जे जे पंचा महा भुतांच्या लळीतशी निगडीत असते मग ते काव्य असो गद्य असो ते अक्षर असते.म्हणून तर वेदांची गणना अक्षर वान्ग्मायात झाली आहे.ज्या क्षर नाही ते अक्षर ,पंचमहाभूतांची ललिते अशीच चालू राहणार ,त्या ललीताना आपल्या कवितेत गुंफणारे काव्य अलोकिक आणि अजरामर ठरते ,कारण निसर्गाच्या लीला कायम असतात पण कवीच्या मनात त्यांना पाहून भाव मात्र बदलत असतात ,निसर्गाशी जवळीक साधत केले गेलेले काव्य अप्रतिम ठरते.मग ते मेघदूत असो अथवा ऋग्वेद चे अवेळी पाऊस असो आर्तता तीच ,हृदयातला ओलावा तसाच,म्हणून हा पाऊस ओले चिंब करतो ,नसा नसातल्या विरहाला जागवतो ,अतिशय नाजूक आणि भावस्पर्शी शब्दांचा फुलोरा फुलवणारी ह्याची कविता एक अप्रतिम कविता.शब्द भाव आणि सूर ह्याचा आरस्पानी नजराणा घेऊन आलेला हा "अवेळी पाऊस"नुसताच हवा हवासा वाटत नाही तर सतत बरसावासा
वाटतो..
ऋग्वेद चे काव्य सर्वगामी आहे ,आयुष्यातल्या टप्प्या टप्प्यातले हिशोब सांगणारे,मैत्रीच्या रमल खुणा आरस्पानी शब्दांच्या मीना बाजारात मांडणारे अथ पासून इति पर्यंतचा प्रवास अतिशय सुरेलपणे पार पडणारे.लोभस मोहक तरीही परखड. सांज हि कविता मैलाचा दगड ठरावी इतकी लक्षणीय.
ऋग्वेद हा कविता संगीत आणि निर्मिती ह्या तीनीही क्षेत्रतात प्रकाशणारा सायंतारा आहे ह्याच्या चांदण्यात केवळ शब्दांचीच रोषणाई नाही तर माणुसकीची हि उब भासते.,;ऋग्वेद ला मैत्रयाणाच्या शुभेच्छा.
शशांक रांगणेकर मुंबई ,
९८२१४५८६०२
जे जे पंचा महा भुतांच्या लळीतशी निगडीत असते मग ते काव्य असो गद्य असो ते अक्षर असते.म्हणून तर वेदांची गणना अक्षर वान्ग्मायात झाली आहे.ज्या क्षर नाही ते अक्षर ,पंचमहाभूतांची ललिते अशीच चालू राहणार ,त्या ललीताना आपल्या कवितेत गुंफणारे काव्य अलोकिक आणि अजरामर ठरते ,कारण निसर्गाच्या लीला कायम असतात पण कवीच्या मनात त्यांना पाहून भाव मात्र बदलत असतात ,निसर्गाशी जवळीक साधत केले गेलेले काव्य अप्रतिम ठरते.मग ते मेघदूत असो अथवा ऋग्वेद चे अवेळी पाऊस असो आर्तता तीच ,हृदयातला ओलावा तसाच,म्हणून हा पाऊस ओले चिंब करतो ,नसा नसातल्या विरहाला जागवतो ,अतिशय नाजूक आणि भावस्पर्शी शब्दांचा फुलोरा फुलवणारी ह्याची कविता एक अप्रतिम कविता.शब्द भाव आणि सूर ह्याचा आरस्पानी नजराणा घेऊन आलेला हा "अवेळी पाऊस"नुसताच हवा हवासा वाटत नाही तर सतत बरसावासा
वाटतो..
ऋग्वेद चे काव्य सर्वगामी आहे ,आयुष्यातल्या टप्प्या टप्प्यातले हिशोब सांगणारे,मैत्रीच्या रमल खुणा आरस्पानी शब्दांच्या मीना बाजारात मांडणारे अथ पासून इति पर्यंतचा प्रवास अतिशय सुरेलपणे पार पडणारे.लोभस मोहक तरीही परखड. सांज हि कविता मैलाचा दगड ठरावी इतकी लक्षणीय.
ऋग्वेद हा कविता संगीत आणि निर्मिती ह्या तीनीही क्षेत्रतात प्रकाशणारा सायंतारा आहे ह्याच्या चांदण्यात केवळ शब्दांचीच रोषणाई नाही तर माणुसकीची हि उब भासते.,;ऋग्वेद ला मैत्रयाणाच्या शुभेच्छा.
शशांक रांगणेकर मुंबई ,
९८२१४५८६०२