Thursday, August 16, 2012

चिरंजीव ऋग्वेद ,

चिरंजीव ऋग्वेद ,
सप्रेम आशिर्वाद,तुझा निरोप मिळाला ,माझा लेख आवडला त्या बद्दल धन्यवाद,ऋग्वेद तुझा अवेळीचा पाऊस ,आणि सांज ह्या दोन्ही कविता ,मन मोहवून गेल्या ,ह्या दोन्ही काव्यात सांगितलेला घटना सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातही घडतात पण तुझ्या सारख्या कवींना मात्र त्यात काव्य दिसते म्हणून तर म्हणतात "जे न देखे रवी ते देखे कवी"तुझी कविता एक बंदिश वाटते शब्दात बांधलेली पण भावात भावनांना मोकळी करणारी,ऋग्वेद तू नावाप्रमाणेच ऋग्वेद ,तू मला आहेस ऋचाने बनलेला एक वेद ज्याच्या प्रत्येक ऋचेत मंत्र साधना आणि सामर्थ्य आहे ,मानवी मनाच्या स्पंदनाची भावगर्भ आवर्तने ह्या कवितेत आढळतात.,तुझ्या कवितेचे यथायोग्य वर्णन करण्याची क्षमता माझ्या शब्दात नाहीच नाही,तू मला भेटायला येशील तेव्हा मनात कृतज्ञतेचे उठणारे भाव म्हणतील "पुंडलिका भेटी परब्रम्ह आलेगा".माझा दूरध्वनी क्रमांक ९८२१४५८६०१ आहे.
शशांक रांगणेकर.