Saturday, September 22, 2012

रोहन वरद

रोहन वरद
निवडूंगचा फडा,खरोखर सुंदर दिसतो ,आणि जेव्हा त्यावर लाल रंगाचे फुल उमलते तेव्हा तर त्याचे सौंदर्य अप्रतिम असते ,मर्दानी सौंदर्याचे एक रुपकच,तंदुरुस्त ,शब्द वापरावा इतके सळसळते व्यक्तिमत्व ,खर्जात उमलणारे प्रमाथी स्वर गंध ,अगदी प्रथम पुरुषी एक वचनी रूप .नाव" रोहन गोखले".

वरद खरे ,सत्याचे आश्वासक अशीर्वाद्कारी रूप ,एक शुद्ध आणि सत्विक स्वर प्रणालीचे स्वर गुंजन.चौदा विद्यांचे तेज बुद्धीदात्याच्या आशीर्वादाने प्राप्त झालेले अल्ल्हाद्कारी सात्विक रूप . दोघेही तरुण नागपूरचे वैदर्भी कलाकारीचे उमलते भविष्य .

जीव आणि शिव हि संकल्पनाच ह्या जोडीने प्रत्यक्षात आणली आहे ,रोहनने लिहावे आणि वरद ने सूर द्यावेत ,शब्द रोहनचे असावेत आणि सूर वरदने फुंकावेत अशी एकात्मता.

केवळ गीतकार गायक अथवा संगीतकार ह्याच भूमिकेत हे वावरत नाहीत तर संपूर्ण संकलन आणि निर्मितीची जवाबदारी घेऊन नवोदित कलाकारांना मदतीचा हात पुढे करतात.कलाक्षेत्रात हि जोडी अतिशय मनमिळाऊ ,नम्र आणि तरीही परखड मत व्यक्त करणारी म्हणून प्रसिद्ध आहे .संगीताचे पूर्ण समज ,तरुणाई च्या आवडीची नस माहित असणारी ,आणि गीतकाराच्या शब्दांचा भावांचा गाभा अबाधित राखत त्य्च्याच स्वप्नाचे फुलोरे त्याच्या भावात फुलवणारी निर्मिती करणे हा ह्याचा हातखंडा खेळ आहे.

रोहन वरद ची कलाकारी बहु आयामी आहे कुणाला काय आवडते ह्याची त्यांना नेमकी जाण आहे ,हे खर तर फार कठीण काम पण ह्यांच्या नावातच सर्व काही दडले आहे पुढे जाण्याचा आशीर्वादच घेऊन ते आले आहेत.

श्रीकृष्ण हे आम्हा भारतीयांचे लाडके दैवत आम्हाला त्याची अनेक रूपे भेटतात दिसतात ,रोहन मधला गोकुळात रमणारा एक अनंग स्वरूपी श्रीकृष्ण आणि वरद मध्ये प्रतीत होणारा गीता सांगणारा सत्व आणि तत्व रुपी श्री कृष्ण दोनीही एकाचीच रूपे ,मैत्रायानाचे ह्या दोन्ही रूपाना हार्दिक शुभेच्छा

शशांक रांगणेकर मुंबई
९८२१४५८६०२

Tuesday, September 11, 2012

मयूर घोडे


मयूर घोडे
कवितेत काय असते आणि काय असायला पाहिजे हा प्रश्न अनेक कवींना पडतो ,पण मयूर घोडेला मात्र हा प्रश्न पडत नसावा किंवा पडणार हि नाही,कारण मयूर हा जात्याच कवी आहे ,मनात उमटणाऱ्या भावनांचे चित्रण सरळ आणि सोप्या शब्दात तो कवितेत . करतो,.उगाच शब्दांची आतिषबाजी नाही कि विचारांची सर्कस नाही जे वाटते भावपूर्ण अविष्कारात शब्दांकित करणारी त्याची कविता खरोखर मनाला भावते,
जे विचार ज्या भावना हृदयावर तरंगतात त्यांचे निरागस शब्दांकन मयूरच्या कवितेत उमटते.
कविता हि स्वयंभू असते किंबहुना असावी लागते नाही तर आज मी कविता लिहिणार आहे म्हणून केलीली कविता उपहार गृहातल्या जेवणा सारखे वाटते , पोट भरते पण मन भरत नाही,मयुराची कविता मात्र घरघुती स्वयंपाका सारखी मसाल्यांची चव नसूनही सुग्रास आणि पाचक वाटणारी ,सालस सुगरणीच्या अन्ना सारखी.
कवितेच्या नावाखाली शब्दातले बरेच कागदी ताबूत नाचवले जातात पण भाव नसल्याने ते दिखावटी आणि निर्जीव वाटतात.
कविता हि उपजते कवी मनातल्या भावनांना ती जन्माला घालते ,आणि फक्त शाब्दिक वेणा सरस आणि सकस कवितेला जन्म देऊ शकत नाही .
मयूर हा एक तरुण कवी आहे त्याच्या कवितेत निरागसता आहे ,नवथर भाव आहेत आणि स्वतःच्याच अनुभवाचे मासूम चित्रण आहे, आणि म्हणूनच रसिकाला ते भावते,रानात फुललेल्या मोहाच्या झाडा सारखे वाटते.विचाराची मुळे मनाच्या खोलवर मातीत रुजवणारी कविता .
प्रेमवेडा ,चांदणी .डोहाळे,वाट पोर्णिमा ह्या मयुराच्या कविता सांगतात एका तरुण मनाची कुजबुज जी ऐकाविशीही वाटते आणि आठवण करून देते एका रान फुलाच्या गुच्छ ची जो मोहक आहे आणि सुन्गाधीही आहे आपल्या नवथर प्रेमाची ओळख सांगणारा.मयूरच्या ह्या रानफुलांना मैत्रयाणाचे अनेक आशीर्वाद
शशांक रांगणेकर मुंबई
९८२१४५८६०२

Tuesday, September 4, 2012

स्मरण गाथा समीर पाठक

स्मरण गाथा समीर पाठक
स्मरणात तू असतेस तू नेहमीच अगम्य ,समीरच्या कवितेतली एक ओळ ,थेंबात तळे दाखवणारी आशय घन कविता,समीरच्या कवितेत कल्पनेचे उंचच उंच झोके दिसतात ,आठवणी आणि स्मरण ह्या दोन शब्दातले भावांतर ,समीरने अगदी बोलके केले आहे,नश्वर पासून ईश्वरा पर्यंतची उंची गाठणारी एक फक्त दोन ओळींची कविता,आठवणीतले येणे जाणे नेहीमीच असते ,पण स्मरणात तू अगम्य म्हणत मन आणि हृदय यातील फरक दाखवणारी कविता .फक्त दोन ओळींची ,मंत्र सारखी लहान असूनही महान ठरणारी.
समीरची कविता वास्तवाची धग नेहमीच जागती ठेवत कल्पनेचे पंख लाऊन हि वास्तवाच्या मातीतच आपल्या पावलांच्या रमल खुणा उमटवते"..
असेल कोणीतरी एखाद्या वळणावर हीही अशीच प्रेमाच्या नावाची शोध घेणारी कविता ,कोणीतरी केवळ आपल्यासाठीच आहे ह्याचा शोध घेणारी प्रथम पुरुषी एक वचनी कविता ,त्याच्यावर प्रेम करणाऱ्या ,त्याचे एकाकी पण संपवणाऱ्या कुणाचा तरी शोध घेणारी ,आणि तारुण्य सुलभ भावनांची शाई कागदावर शिंपडाव णारी एक नवथर कविता.,शब्दांची फुले नाजूक पणे गुंफणारी कविता.
कविता हे एक प्रभावी साधन आहे मनातल्या भल्या बुऱ्या साऱ्याच भावनांना प्रगट करण्याचे ,आपल्या साऱ्या कविता केवळ कागदी कपटे नव्हते कधीना कधी जिच्यासाठी त्या आहेत तिला त्या नक्कीच उमगतील ह्याची दुर्दम्य आशा बाळगणारी समीरची आशा लवकरच पुरी व्हावी हि ईश चरणी प्रार्थना.नाजूक शब्दांचे बिलोरी आरस्पानी रूप घेऊन फुलणारी समीरची कविता अशीच फुलो असे मैत्रायानाचे सप्रेम आशीर्वाद.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Monday, September 3, 2012

हे जीवन सुंदर आहे..

हे जीवन सुंदर आहे..." चौकट राजा चित्रपटातलं मनात घर करून राहिलेलं हे गीत. आयुष्य सुंदर करायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या छंदाचा हात हाती असायला हवा. छंद जोपासताना वयाच बंधन नसत. निसर्गाकडून मिळालेलं हे एक अद्भुत वरदान आहे.
       अद्वितीय रंगसंगती आणि अदाकारीने सर्वांना थक्क करणाऱ्या फुलपाखराला कोणी कधी निर्गंध, कोमेजलेल्या फुलावर भिरभिरताना पाहिलंय...? असाच एखाद फुलपाखरू आपल्याला दिसलं तर...? एक असच फुलपाखरी व्यक्तिमत्त्व जे एक आगळा छंद जोपासाताय....! "गुण गाईन आवडी...!" श्री.शशांक जी रांगणेकर...! एक चिरतरुण व्यक्तीमत्व....! कॉर्पोरेट क्षेत्रात बहुश्रुत असलेल्या रांगणेकर काकांची साहित्याशी जमलेली गट्टी पाहिली कि, वाचनशुन्य माझं मलाच लाजीरवाण वाटत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकातील चांगल्या गुणांचं आवडीने गुणगान गाणं "मोठेपणा" याहून दुसर काय असू शकतो. फुलपाखरू प्रत्येक फुलातून मधु प्राशन करत भिरभिरत असत. हे फुलपाखरी व्यक्तिमत्त्व मात्र आपल्याठायी असलेल्या माधुर्याचा मुक्तहस्ताने वर्षाव करत कोमेजलेल्या फुलासही नवा तजेला देण्याच कार्य करत आहे.
       तुमच्या ठायी असलेल्या माधुर्याचा थेंब चाखण्याची संधी दिल्याबद्दल देवबाप्पाचे आभार. काका तुमच्या ह्या आगळ्या वेगळ्या छंदास साष्टांग नमस्कार...!

आपला,

सुरज उतेकर....!!

"मैत्रायण"

प्रिय जनहो
आयुष्यात चांगली माणसे भेटणे हा दैव(देव)योगच म्हणायचा,त्या देव योगाने आयुष्य संपन्न होत आलाय,"अंनंत हस्ते कमलाकराने ,देता किती घेशील दो कराने"हे नक्षत्रंचे देणे सांभाळून तरी कसे ठेवायचे आणि कुठे ,अमृतात पैजा जिंके अश्या माय बोलीचाच आसरा ,,मला भेटलेल्या ह्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण असमान्यात्वाची अदृश्य कवच कुंडले धारण करणाऱ्या ह्या मित्रांची मी रेखाटलेली वेडी वाकडी काहोईना चित्रे
तुमच्या पुढे सादर करण्याची मनोमन इच्छा ,साधन "मैत्रायण ""अपुरी शब्दसंपत्ती आणि अपुऱ्या प्रतिभेचा वारसा घेऊन येणाऱ्या ह्या संकल्पनेला फक्त तुमच्याच प्रेमाचा बुडत्याला काडी सारखा वाटणारा आधार ,तुमचा वाचनीय पाठींबा सदैव असो द्यावा .जिथे पु.ल.सारखी दैवत जन्माला येतात तिथल्या मातीलाही फुलांचा वास येतो हेच खरे,मग ते कोर्हन्तीचा का असेना ,मी अभिमानाने सांगतो कि मी पार्ल्याचा आहे ज्या पार्ल्याचे नाव पु ल.नि अजरामर केले ,माणसांनी माणसाचे देव गुण वर्णावे हा त्यांनी दिलेला वारसा ,त्याची जपणूक करण्याची केलेली एक केविलवाणी का होईना धडपड ,,"मैत्रायण"
शशांक रांगणेकर

Saturday, September 1, 2012

सद्सद बुद्धीचा रखवाल दार नीरद जकात दार


सद्सद बुद्धीचा रखवाल दार नीरद जकात दार
गोपाल कृष्ण आगरकर ह्यांचा उल्लेख महात्मा गांधी आदराने" माझ्या सद्सद विवेक बुद्धीचा रखवाल दार "असा करत. मराठी तरुणाई किती संस्कार क्षम आहे ह्याची उदाहरणे फेस बुक च्या वाल वर वाचायला मिळते तेव्हा समाधानाचा सुस्कारा सोडावासा वाटतो.समाजाच्या ,तरुणाई च्या शुचितेचे डोळ्यात तेल घालून राखण करण्याचे काम,वेळ प्रसंगी शाब्दिक कोरडे ओढण्याचे काम तरुणच करताहेत हि अशादाई बाब आहे.,
नीरद जकातदार हा असाच एक लेखक त्यांनी लिहिलेले दोन लेख माझ्या वाचनात आले ,त्याच्या गुरुवारचा टी वी वर प्रसारित होणारया मालीकांवराचा लेख हा असाच एक अभ्यास पूर्ण लेख.ह्या मालिका काय करू शकतात ह्याची चुणूक आपल्या लेखात मांडताना नीरद म्हणतो "समाजातील बहुतांश सर्व साधारण लोक अंधश्रद्धा ,भूत प्रेत,,अशा गोष्टींवर चटकन विश्वास ठेवतात आणि त्याच्या नदी लागून जीव देण्या घेण्या पर्यंत मजल मारतात.
टी वी ,सिनेमा ,नाटक हि अतिशय प्रभावी माध्यमे आहेत जनमानसावर ह्यांचा फार मोठा पगडा असतो,वृत्तपत्र ,पुस्तके पेक्षाही ह्यातून पसरले जाणारे विचार द्रुत गतीने पसरतात आणि आणि विश्वासली जातात,"ब्रेकिंग न्यूज "नावाखाली पसरवले जाणारे अर्ध सत्य जन सामन्यांच्या मनावर अधो रेखित होते.
बऱ्याच वाहिन्यांवर मालिका दाखवल्या जातात तिथे तर कहरच होतो ,सत्य आणि वास्तवाशी फारकत करूनच बहुतांश ह्या मालिका बनविल्या जातात ,अतिरंजित दृश्ये ,आणि हिंसा,दुराचार ,त्या दुराचाराचे नागडे समर्थन ,आणि पांचट विनोद हा ह्या मालिकांचा गाभा असतो,.अनैतिक संबध ,इर्षा,हिंसा ,ह्यांनीच आपले समाज जीवन भरले आहे का असा संशय निर्माण केला जातो. मराठी मालिकाही त्याच दिशेला चालल्या आहेत,काही मोजके अपवाद सोडता मराठी मालीकानाही हि कीड लागते आहे ,ह्या मालीकातले दुषित नाते संबंधाचे चित्रण अतिशय पोकळ आणि अवास्तव वादी पद्धतीने चित्रित केले जाते आहे,अनैतिक संबंध आणि संशय ह्यातून ओढून ताणून आणलेले नाट्य ,सगळेच खोटे.पण चित्रण इतके प्रभावी की जन सामान्यांना खरेच वाटावे ,.काही काही निर्माते प्रतिथ यश दिग्दर्शक ह्यात निपुण झाले आहेत त्यांचा भाव ह्याने वधारला आहे ,हे चित्रण भयावह आहे ,मराठी मनातल्या सोज्वळ कुलवधू च्या प्रतिमेला तडा देणारे आहे "माझा बाप कोण "अशी संशयाची सुई पैदा करणारे आहे ,स्त्री पुराषांच्या पवित्र नात्यांना नर मादीचे नाते ठरवणारे चित्रण होते आहे.,सवंग लोकप्रियता प्रसिद्धी आणि पैश्या साठी काहीही करू अश्या ह्या मालिका आणि त्यांचे निर्माते आणि दिग्दर्शक वागताहेत.आमचे समाज जीवन इतके प्रदूषित झाले आहेका , नक्कीच नाही , आमच्यातला वारकरी अजूनही जिवंत आहे आणि मला त्याचे दर्शन होते आहे ह्या तरुणाई तून ,नीरद सारखे तरुण अजूनही सजग आहेत ,अप्प्रवृतींशी लढायची हिम्मत दाखवताहेत ,विवेचनातून प्रबोधन हा त्यांचा मार्ग आहे,एक जागल्या जगते राहो म्हणून हाक देणारा ,व्यासंग ,भाषा,आणि विचार ह्याच्या जोरावर अपप्रवृत्तीवर जोरदार हल्ला करणारा तरुण,मन भरून येते .देवाचे उपकार मानावेसे वाटतात सांगावेसे वाटते देवा नीरद सारखे सुपुत्र ह्या मातीला द्यायला ह्या मातीने केलेला पुत्र कामेष्टी यज्ञ नक्कीच सफल झाला आहे.. धोक्याची घनता वाजवणारे नीरद सारखे सुपुत्र हेच ह्या समाजाला तारतील,अगदी देवा सारखे ,आणि म्हणतात ना"देव तरी त्याला कोण मारी ".अप्रवृती चा मुकाबला आपल्या वैचारिक सुदर्शन चक्राने करणाऱ्या नीरद च्या
कृष्ण रुपाला मैत्रायानाचे सदर प्रणाम .
शशांक रांगणेकर , मुंबई
९८२१४५८६०२