Tuesday, August 14, 2012

ऋग्वेदातल्या ऋचा

ऋग्वेदातल्या ऋचा
जे जे पंचा महा भुतांच्या लळीतशी निगडीत असते मग ते काव्य असो गद्य असो ते अक्षर असते.म्हणून तर वेदांची गणना अक्षर वान्ग्मायात झाली आहे.ज्या क्षर नाही ते अक्षर ,पंचमहाभूतांची ललिते अशीच चालू राहणार ,त्या ललीताना आपल्या कवितेत गुंफणारे काव्य अलोकिक आणि अजरामर ठरते ,कारण निसर्गाच्या लीला कायम असतात पण कवीच्या मनात त्यांना पाहून भाव मात्र बदलत असतात ,निसर्गाशी जवळीक साधत केले गेलेले काव्य अप्रतिम ठरते.मग ते मेघदूत असो अथवा ऋग्वेद चे अवेळी पाऊस असो आर्तता तीच ,हृदयातला ओलावा तसाच,म्हणून हा पाऊस ओले चिंब करतो ,नसा नसातल्या विरहाला जागवतो ,अतिशय नाजूक आणि भावस्पर्शी शब्दांचा फुलोरा फुलवणारी ह्याची कविता एक अप्रतिम कविता.शब्द भाव आणि सूर ह्याचा आरस्पानी नजराणा घेऊन आलेला हा "अवेळी पाऊस"नुसताच हवा हवासा वाटत नाही तर सतत बरसावासा
वाटतो..
ऋग्वेद चे काव्य सर्वगामी आहे ,आयुष्यातल्या टप्प्या टप्प्यातले हिशोब सांगणारे,मैत्रीच्या रमल खुणा आरस्पानी शब्दांच्या मीना बाजारात मांडणारे अथ पासून इति पर्यंतचा प्रवास अतिशय सुरेलपणे पार पडणारे.लोभस मोहक तरीही परखड. सांज हि कविता मैलाचा दगड ठरावी इतकी लक्षणीय.
ऋग्वेद हा कविता संगीत आणि निर्मिती ह्या तीनीही क्षेत्रतात प्रकाशणारा सायंतारा आहे ह्याच्या चांदण्यात केवळ शब्दांचीच रोषणाई नाही तर माणुसकीची हि उब भासते.,;ऋग्वेद ला मैत्रयाणाच्या शुभेच्छा.
शशांक रांगणेकर मुंबई ,
९८२१४५८६०२

Monday, August 13, 2012

दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो

दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो
सगुण परमेश्वराची आराधना करणे हि सामान्य माणसाची उपासना पण पर्वत शिखरावर दऱ्या खोऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वराला निर्गुण रुपात पाहणे हे फक्त योग्यालाच शक्य असते,निसर्गा कडे चला हा संदेश घेऊन ,तुमच्या कडे आलाय एक योगी नाव "सगुण भडकमकर"
सगुण हा खऱ्या अर्थाने पर्यावरण वादी आहे.निसर्गाच्या कुशीत जाऊन एकदातरी आभाळमाया अनुभवल्या शिवाय,शिवाय रान वारा फुफ्फुसात भरून घेतल्या शिवाय शहरी आयुष्याला पर्याय नाही हे आजकाल सर्वांनाच पटते आहे ,
सगुण ने आपल्या अथक परिश्रमाने मुरबाड जवळ एक मय सभा निर्माण केली आहे ,शत प्रती शत पर्यावरण वादी बांध काम,निसर्गाचे रौद्र रूप दाखवणारा तर कधी कधी अलुगुजासारके मंजुळ स्वर घुमावणारा रान वारा,हिरव्याकंच हिरवळीची शेलारी पांघरलेली सवाष्ण दरी आणि सोनेरी प्रकाश रेखा पसरवणारे कोवळे उन ,डोंगरांना डोळे मिचकावत मिचकावत ढुश्या देत देत पाळणारे ढग आणि इदं न मम म्हणत पर्वतावरून कोसळणारे जल प्रपात सारच काही काव्यमय ,सगुणाच्या ह्या प्रकल्पाचे नावच आहे हिरवे स्वप्न,खरोखर असे वाटते कि आयुष्यात एकदातरी निसर्गाचे हे मनमोहक रूप डोळे भरून बघावे ,एकदातरी तो पश्चिम वारा फुफ्फुसात भरून घ्यावा आणि ,शरीराचा रोम न रोम पुलकित करणारे निसर्ग स्पर्श अनुभवावे ,कदाचित हा तेजोमय स्पर्शच मनावरची काजळी पुसून उर्वरित आयुष्य लखलखीत करेल ,हेव्या दाव्याचे रुपया पैश्याचे ,देण्या घेण्याचे जग क्षण भर विसरता येईल आणि तो क्षण भरचा अमृत स्पर्श उर्वरित आयुष्य सुगंधित करेल.
सगुण हा एक उत्तम प्रकल्पक आहे विज्ञान आणि प्रकृती च्या हातात हात गुंफून त्याने हा प्रकल्प रेखाटला आहे ,आजच्या माणसाच्या गरजा आणि त्या गरजांची पूर्तता ह्यांची उत्तम सांगड त्यांनी इथे घातली आहे.
शून्यातून विश्वाची निर्मिती करताना शून्यालाच शरण जावे लागते ,आदि अंत जिथे संपतात ते शून्य ,सागुंच्या ह्या शून्यात सर्जनाचा एक आगळावेगळा अविष्कार आहे ,,सगुण ची माहिती त्याच्या वेब साईट वर नक्कीच मिळेल पण निर्गुण रूपातल्या सगुण ला पहायचे
असेल तर पळू लाच जावे लागेल ,कारण ते भावांकन शब्दात करण्याचे सामर्थ्य माझ्या तरी शब्दात नाही.
पाळूहून निघताना संध्याकाळ रात्रीकडे सरकत होती निसर्गाचे तेजोरूप मनातून निसटत नव्हते ,,एका निर्गुण स्वरूपी सगुण मनात रुजला होता ,त्याची अथक मेहनती वृत्ती ,आणि त्याच्या रोमारोमात प्रगट णारे निसर्गायण ,साऱ्याची रानभूल मनावरून उतरली नव्हती ,त्या वेळी सागुंची आठवण दोन ओळीत आली "दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो."
निसर्गाच्या ह्या सगुण रुपाला मैत्रयाणाचे लक्ष लक्ष अभिवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२

Wednesday, August 8, 2012

राधा कृष्णावरी भाळली

राधा कृष्णावरी भाळली
राधा आणि अमोल मला भेटलेले एक निरागस मेहूण,मेहूण हा शब्द वापरण्या इतके स्वच्छ आणि प्रसन्न आणि प्रफुल्ल.
मेहूण हा शब्द इतका भावांकित आहे कि त्याचा समानार्थी शब्द पती पत्नी ,अथवा नवरा बायको असा होऊ शकत नाही पूजेच्या दिवशी शंकर आणि पार्वतीचे अथवा लक्ष्मी नारायण स्वरूप समजून सन्मानित करून भोजनाला बोलावल्या गेलेल्या निमंत्रित जोडप्याला मेहूण म्हणतात ,त्या शब्दाची गरिमा आगळी वेगळीच आहे .
अमोल आणि राधा साधारण दोन ते तीन वर्षापूर्वी मला भेटले होते,काही कामानिमित्त्य अमोल राधा बरोबर माझ्या कडे आला होता दोघेही साधारण ४ ते पाच तास माझ्या बरोबर होते ,चिरंजीव राहुल देशपांडे च्या ओळखीने ते मला भेटले. अमोल आणि राधा प्रसन्नतेचा एक ठसा माझ्यावर उमटवून गेले ,उच्च पदस्त अमोल म्हणजे एक संस्कारित बियाणे ,ज्याच्या रोमारोमात संस्कार निथळत असतात ,राधाही तशीच ,made for इच other म्हणावे असे,सुशिक्षित संस्कार क्षम सह जीवनाचे एक चालते बोलते रूपक.
प्रेम आपुलकी आदर जिव्हाळा मराठी तल्या ह्या सर्व संस्कारक्षम शब्दांचे प्रगटीकरण करणारे ह्यांचे वर्तन मी अजूनही विसरू शकत नाही.
श्रावण महिन्यात सणावारी मेहूण बरयाच घरात पूजतात त्या आठवणीना उजाळा देणारे हे मेहूण माझ्या कायम आठवणी च्या मखरात बसलेले आहे.
शशांक रांगणेकर

Wednesday, May 30, 2012

प्रसाद नामदेव चव्हाण

प्रसाद नामदेव चव्हाण
काही काही भेटी ह्या आयुष्यात ,योगायोगानेच होतात ,आणि ते योगायोग आयुष्यात बरचसे काही तरी देऊन जातात.नशीब माझ्यावर मेहरबान आहे ह्या बद्दल काही शंकाच नाही.नाहीतर माझ्या सारख्या अत्यंत सामान्य आणि सुमार माणसाला एवढी चांगली माणसे मित्र म्हणून का मिळवीत.उत्तर एकाच "खुदा देता है तो छप्पर फाडके देता है "मित्र म्हणून मला मिळालेल्या ह्या असंख्य व्यक्तींचे ऋण विसरावे म्हंटले तरी विसरू शकत नाही एवढे मोठे.त्यांच्या सुहृदतेचा झालेला सुवर्ण स्पर्श कायमचा ठसा उमटवणारा.

माझ्या मित्रपरिवारात मला काका म्हणून ओळखतात .पण वागतात जिवलग मित्रा सारखे. आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या आयुष्यातली नवी कोवळी उन्हे माझ्याशी शेअर करणारी हे तरुण वयातल्या अंतराचे भान दाखवत नाही पण विसरत हि नाहीत ,मैत्री आणि आदर एक सुरेख चित्रण ह्यांच्या वर्तनात नेहमीच जाणवते .नव्या पिढीचा मी शतशः ऋणी आहे.ह्या मित्रांच्या नामावलीतले एक तारांकित नाव "प्रसाद नामदेव चव्हाण ".

दुर्गा सखा संस्थेचा एक खंदा कार्यकर्ता ,आणि आमच्या मनूचा भाऊ ,चुलत भाऊ म्हणत नाही कारण प्रेम सख्या भावान पेक्ष्याही जास्त.नाते काय असावे किती असावे आणि कसे असावे ह्या सर्व ककारांचे समर्पक उत्तर .मनु दादा आणि प्रसाद म्हणजे आजचे राम लक्षमण ,दादाचे प्रसाद वरचे प्रेम आणि प्रसादला असलेला दादाचा अभिमान ह्याचे मनोहारी चित्रण नेहमीच दिसते.
प्रसाद हा उत्तम छाया चित्रण करतो ,छायाचित्रण चव्हाणांच्या रक्तातच आहे.पण प्रसाद नुसताच फोटो काढत नाही तर ते सजीवही करतोअशी ह्याची छायाचीत्रणे आहेत .
आजची पिढी काहीच वाचत नाही सुसंस्कृत नाही ह्या आक्षेपाचे उत्तर म्हणजे प्रसाद.साहित्य कविता इतिहास ,संत साहित्याचा अभ्यास ह्या सर्व अलंकाराने सालंकृत असलेले प्रसादचे व्यक्तिमत्व फारच लोभस आहे.
प्रसाद ची माझी भेट नुकतीच झाली आदिवासी पाड्याला जाताना तो आमच्या बरोबर होता खरे म्हणाल तर आम्ही त्याच्या बरोबर होतो ,निसर्गाचे अनादी आणि अनंत रूप आपल्या तृतीय नेत्रात तो सामावून घेत होता त्याच्या छाया चित्रणाची पोत काही वेगळीच निसर्गाशी जिवंत जवळीक साधणारी.एक प्रगल्भ कलाकारीची जाण असलेली .लहान वयातही मनाचा मोठेपणा दाखवणारी.पण तरीही तरल आणि सुगम.
आयुष्याचा सारीपाट खेळताना पडणारे प्रत्येक दान उजवच असेल असे नाही हे ज्याला उमगले तोच खरा ज्ञाता आणि जेता हि .प्रसाद मध्ये ह्या प्रासादिक गुणांना मैत्रयाणाच्या हार्दिक शुभेच्छा.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२

Friday, May 25, 2012

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी

नाद स्वर आणि सूर ,शब्द ,परमेश्वरा ने माणसालानव्हे तर संपूर्ण जीव सृष्ठीला दिलेली एक अलोकिक देणगी ,आणि ह्या देणगीची आराधना किंवा उपासना करणारे कलाकार मग ते गायक असोत ,वादक असोत अथवा कवी किंवा चित्रकार ,सर्व परमेश्वराचे प्रेषित ,त्या प्रेषितांचे ह्या भू तलावारचे अस्तित्व हि ईश्वराच्या अस्तित्वाची जिवंत ओळख.नाद ब्राम्हची उपासना हे ईश्वरी उपासनेचे अनन्य रूप .
शब्द आणि सुरांबरोबर ताल नाद नसतील तर तर गायन अगदीच फिके वाटते ,गाण्या बरोबर तबला पेटीची साथ नसणे म्हणजे हळदी कुंकवा शिवायची सवाष्ण .शब्द आणि सुरांबरोबर गाण्यात पेटी आणि तबल्याचे मेहुण पाहिजेच पाहिजे आणि त्रिताल झपताल ह्यांची साथ नसेल तर सगळेच बेचव आणि अळणी.
कोंकण म्हणजे परशुराम भूमी ,तेज आणि रूप ह्याचे मनमोहक चित्रण कोंकण वासीयांच्या चित्रित होतेच.रूप तेज आणि गुणाचे संचित साथीला घेऊन येणारे एक गुणी व्यक्तिमत्व ."प्रसाद विलास पाध्ये
".प्रसाद एक तबला नवाझ आहे .नवाझ म्हणजे राजकुमार ,खरोखर राजकुमाराच सगळ्या गायकांना हवाहवासा वाटणारा,उदार दिलदार आणि आश्वासक. गायकाला साथ करताना स्वतःचे अस्तित्व दाखवत त्याच्या गाण्याला सांभाळणारा एक मित्र.
बऱ्याच वेळेला स्वतःचे मोठेपण गायकांना त्यांच्या कमजोर गायकीच्या कैचीत पकडून दाखवण्याची फार हौस असते पण प्रसाद नावाप्रमाणेच आहे सह कलाकाराला साथ करणारा एक ईश्वरीय प्रसाद भासणारा.मी ह्याला फाडला किंवा भाजून खाल्ला असा कधीही विचार न करणारा .
iit बुद्धिवंत आणि प्रज्ञावंत विध्यार्थ्यांचे माहेर घर.जणू विज्ञान आणि प्रज्ञा साठी साथीने पाणी भरतात.पवई येथील iit मध्ये प्रसाद तबला शिकवतो .कला आणि विज्ञानाचे मनोहर फ्युजन प्रसादने ह्या लहान वयातही अनेक दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे .
पद्मजा फेणाणी ,अश्विनी भिडे,स्वीकार कट्टी पंडित उल्लाहास बापट ,श्रीरंग भावे सारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे.
गुणाचे भांडार ,बोटांवर जणू प्रत्यक्ष शिव शंकराने . दिलेले नाद ब्रम्हाचे वरदान ,आणि रूप तर "रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असे उद्गार आणणारे ,तरीही चेहऱ्यावर निरहंकारी प्रासादिकता विलसणारे भाव. हे तर खरोखरीचे नाक्षत्रांचेच देणे .
प्रसाद च्या वाल वर त्याचे अनेक फोटो लावलेले आहेत आणि काही निसर्ग चित्र णे हि लावलेली आहेत ,त्यातले एक छायाचित्रण आहे हिमालयातल्या डोंगर दरयांचे,आणि त्या पार्श्वभूमीवर उभारलेला प्रसाद ,मनात विचार बळावतात नाद्ब्राम्हचे रूप हि असेच असेल ना पाठच्या वृक्ष राजी सारखेच उत्तुंग आणि मनोहारी अगदी पाध्यांच्या प्रसाद सारखे.
प्रसाद कोकणचा आहे तिथल्या हापूस सारखाच गोड फक्त गोड नव्हे तर स्वताची एक वेगळीच चव सांगणारा अनोखी आणि आगळी वेगळीच शब्दही अपुरे पडणारी.
त्याच्या तबल्याचा नाद ऐकून म्हणावसे वाटते "आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा तबला वाजवतो "
रूप आणि गुणाचे मनोहारी संचित घेऊन आलेल्या ह्या नादब्रम्ह उपासकाला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर


मुंबई ९८२१४५८६०२

Wednesday, May 16, 2012

दिनेश पवार


दिनेश पवार
जीवन जगायची धारणा जो देतो तो धर्म,धर्माची हि व्याख्या सांगणारा एक धार्मिक मला फेस बुक वर सापडला ,आपल्या मनोगतात धर्म आणि त्या बद्दल आपले सुस्पष्ट विचार शब्दांकित करणारा एक युवक ,पशु पक्ष्यांवर मनापासून प्रेम करणारा एक पक्षीप्रेमी,
धर्म आणि जाती ह्यांच्यावर आधारित समाजकारण आणि राजकारण महाराष्ट्र भूमीत कधीच रुजले नाही
महाराष्ट्र भूमीचा धर्म सर्व जाती पंथ ह्यांना एकत्र ठेवणारा धर्म होता आणि आहे ,ज्ञानेश्वर ,तुकाराम नामदेव सावतामाळी ह्यांनी रुजवलेला वाढवलेला धर्म आहे. त्या धर्माचे नाव मानवता.मराठी साहित्यालाही धर्माचे वावडे नाही ,मुस्लीम धर्मीय संत कवी ,मराठीतले ख्रिस्त पुराण हि हि  मराठीची लाडकी अपत्ये.
शिवाजी हा महाराष्ट्राचा राजा होता ,महाराष्ट्रातल्या मुस्लीम बंधावानाही तो तितकाच प्रिय होता आणि आहे कारण शिवरायाच्या राजकारणाला जातीय अथवा धर्मांध राजकारणाचा रंग नव्हता त्याचा रंग भगवा होता एक शुचितेचा रंग ,विरक्तीचा रंग ,राजा हा जगाचा उपभोग शून्य स्वामी असतो ह्या तत्वांवर नितांत विश्वास असणारा राजा होता सर्व प्रजा हि समान लेकारासारखी असे समजणारा एक कुटुंब प्रमुख ,हा आपला तो परका अशी वृत्ती राजांच्या ठाई
नव्हती .जाती आणि धर्मापासून दूर राहणारे आणि सर्वांनाच सामावून घेणारे त्यांचे राजकारण होते ,म्हणूनच तत्कालीन समाजात सर्व जाती धर्मात शिवाजी राजे आमचा शिवाजी म्हणून लोकप्रिय होते मानवता ह्या एकाच तत्वावर शिवरायाचे राजकारण आधारित होते आणि त्यामुळेच त्यांची लोकप्रियता आजही सर्व धर्मीय जनमानसात टिकून आहे. धर्मांधतेची विषवल्ली ह्या मातीत कधीही रुजली नाही आणि रुजणार हि नाही.
इतिहासाची पुनरावृत्ती होते ,शाहीर अमर शेख ह्यांच्या सुकन्या सुश्री प्रेरणा अमरशेख ह्या आमच्या पार्ले महाविद्यालयात शिकत होत्या , फॉर्म भरताना जात आणि धर्म ह्या सदराखाली घातलेला "मानवता"हा शब्द बदलण्यास त्यांनी नकार दिला होता. गीता रहस्य लिहिणारे बाल गंगाधर टिळक तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी म्हणून "लोकमान्य "होते .मानवतेचा मळवट भरलेले राजकारण आणि समाजकारण हीच मराठी माणसाची खरी ओळख .आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एक मराठी युवक जो फार तर २४ /२५ वर्षाचा असेल तो ह्या तत्वज्ञानाचे समर्थन करतो आहे. दिनेश तुझ्या सारख्या तरुणांच्या हातातच महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे मी दिनेश पवार ह्या व्यक्तीला व्यक्तीशः ओळखत नाही पण माझ्या ओळीखिचा आहे त्याचा मानव धर्म ,पशु पक्ष्यांवरचे त्याचे प्रेम ,उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा म्हणून मनाला भिजवणारी हाक,आणि केवळ मनुष्य जातीवर नव्हे तर तुमच्या बरोबर ह्या वसुंधरेवर सह प्रवासी म्हणून आलेल्या सर्व सजीवांवर प्रेम करा आणि त्यांचाही जगण्याचा हक्क मान्य करा म्हणून केलेली एक कळकळीची विनंती.
दिनेश हे सूर्याचे नाव आहे अंधार संपतो प्रकाशाचे राज्य चालू होते समाजाच्या ,मनातला अंधार संपायला मानवतेचे प्रकाश किरण उगवावे लागतात ,आपल्या नावाला साजेसे काम करणाऱ्या दिनेश पवारला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर


Thursday, May 10, 2012

विशाल महामुनी

रोहन मंकणी पुण्यातला मनसेचा एक युवा नेता ,
महाराष्ट्रातल्या आगामी राजकारणातला एक विन चा घोडा ,एक धडाडीचा युवा नेता ८०%समाज कारण आणि २०%राजकारण हि त्याच्या राजकारण करण्याची पद्दाथ असावी.
रोहन मधला सर्वात मोठा गुण म्हणजे आपल्या बरोबर कार्य कर्त्यांना तो सामील करून घेतो .हा कार्यकर्त्यांचा सहभाग रोहन आणि त्याच्या कार्यकर्त्यांना समाज सेवेचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देत आहे ,गोवर्धन उचलायलाही कृष्णाने आपल्या सर्व गोपाल मित्रानाही सहभागी करून घेतले होते ,रोहनच्या राजकारणाचा बाज नेमका हाच आहे त्याचे राजकारण भाच्या पुताण्याचे नाही तर "महाराष्ट्र धर्म वाढवावा "ह्या साथ संगतीवर चालणारे राजकारण आहे. भविष्यातल्या पुण्याच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण करण्याची ती नांदी आहे .

नेत्याचे बळ त्यांच्या कार्यकर्त्यात असते हे महाराष्ट्रातले राजकारणी विसरले असावेत ,नाहीतर इम्पोर्टेड नेतृत्व आणि प्रादेशिक नेतृत्व असा कलगीतुरा नाचला नसता ,पण मला वाटते कि महाराष्ट्राच्या मातीत रुजणारे नेतृत्व उदयाला येते आहे आजची तरुणाई ह्या ८०"समाजकारण अनि२०%राजकारण करणाऱ्या ह्या नवी न युवा नेतृत्वाला पाठबळ देते आहे अगदी मनापासून साथ देताहेत .रोहन चा एक साथी "विशाल महामुनी"

नाव किती काव्यमय आहे न ,विशाल महामुनी "नावात काय आहे म्हणतात पण मला वाटते कधी कधी नियती नावातच सर्व काही ठेवते ,
विशाल हा ग्राफिक वेब डिझाय न र आहे ,तो त्याचा व्यवसाय आहे ,पण तो एक उत्तम छायाचित्रकारही आहे आणि तो त्याचा आवडता छंद आहे ,उत्तम छायाचित्रण हे मनाच्या संवेदन शिलतेचे द्योतक असते ,कुठे काय आणि केव्हा ,कसे अश्या क करांची छायाचित्रणात जाण आवश्यक असते ,ह्या लहान वयातही उत्तम छायाचित्रण करणे हा अनुभवाचा नव्हे तर भाग्याचाच भाग समजावा लागेल ,इतकी उत्तम छाया चित्रण कला त्याला अवगत आहे ,.
पुणे हि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ,विशाल सर्व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी असतो ,,
पुण्याचा विकास सर्वांगाने व्हावा आणि त्यात आपला सहभाग असावा अशी मनापासून स्वप्ना पाहणाऱ्या आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या युवकाची एक फळी उभिकारणाऱ्या रोहन चा विशाल बिनीचा शिलेदार आहे ,,रोहन विशाल सारखे तरुण जेव्हा आपल्या सर्व साथीदारांबरोबर मनापासून काम करतात तेव्हा विकासाची गंगा अवतीर्ण व्हायला वेळ लागत नाही ,"महाराष्ट्राला "महा राष्ट्र"करण्याचे स्वप्ना पाहणाऱ्या "रोहन विशाल आणि त्याच्या असंख्य सोबत्यांना मैत्रायाणाचा सलाम
शशांक रांगणेकर