Tuesday, September 4, 2012

स्मरण गाथा समीर पाठक

स्मरण गाथा समीर पाठक
स्मरणात तू असतेस तू नेहमीच अगम्य ,समीरच्या कवितेतली एक ओळ ,थेंबात तळे दाखवणारी आशय घन कविता,समीरच्या कवितेत कल्पनेचे उंचच उंच झोके दिसतात ,आठवणी आणि स्मरण ह्या दोन शब्दातले भावांतर ,समीरने अगदी बोलके केले आहे,नश्वर पासून ईश्वरा पर्यंतची उंची गाठणारी एक फक्त दोन ओळींची कविता,आठवणीतले येणे जाणे नेहीमीच असते ,पण स्मरणात तू अगम्य म्हणत मन आणि हृदय यातील फरक दाखवणारी कविता .फक्त दोन ओळींची ,मंत्र सारखी लहान असूनही महान ठरणारी.
समीरची कविता वास्तवाची धग नेहमीच जागती ठेवत कल्पनेचे पंख लाऊन हि वास्तवाच्या मातीतच आपल्या पावलांच्या रमल खुणा उमटवते"..
असेल कोणीतरी एखाद्या वळणावर हीही अशीच प्रेमाच्या नावाची शोध घेणारी कविता ,कोणीतरी केवळ आपल्यासाठीच आहे ह्याचा शोध घेणारी प्रथम पुरुषी एक वचनी कविता ,त्याच्यावर प्रेम करणाऱ्या ,त्याचे एकाकी पण संपवणाऱ्या कुणाचा तरी शोध घेणारी ,आणि तारुण्य सुलभ भावनांची शाई कागदावर शिंपडाव णारी एक नवथर कविता.,शब्दांची फुले नाजूक पणे गुंफणारी कविता.
कविता हे एक प्रभावी साधन आहे मनातल्या भल्या बुऱ्या साऱ्याच भावनांना प्रगट करण्याचे ,आपल्या साऱ्या कविता केवळ कागदी कपटे नव्हते कधीना कधी जिच्यासाठी त्या आहेत तिला त्या नक्कीच उमगतील ह्याची दुर्दम्य आशा बाळगणारी समीरची आशा लवकरच पुरी व्हावी हि ईश चरणी प्रार्थना.नाजूक शब्दांचे बिलोरी आरस्पानी रूप घेऊन फुलणारी समीरची कविता अशीच फुलो असे मैत्रायानाचे सप्रेम आशीर्वाद.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Monday, September 3, 2012

हे जीवन सुंदर आहे..

हे जीवन सुंदर आहे..." चौकट राजा चित्रपटातलं मनात घर करून राहिलेलं हे गीत. आयुष्य सुंदर करायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या छंदाचा हात हाती असायला हवा. छंद जोपासताना वयाच बंधन नसत. निसर्गाकडून मिळालेलं हे एक अद्भुत वरदान आहे.
       अद्वितीय रंगसंगती आणि अदाकारीने सर्वांना थक्क करणाऱ्या फुलपाखराला कोणी कधी निर्गंध, कोमेजलेल्या फुलावर भिरभिरताना पाहिलंय...? असाच एखाद फुलपाखरू आपल्याला दिसलं तर...? एक असच फुलपाखरी व्यक्तिमत्त्व जे एक आगळा छंद जोपासाताय....! "गुण गाईन आवडी...!" श्री.शशांक जी रांगणेकर...! एक चिरतरुण व्यक्तीमत्व....! कॉर्पोरेट क्षेत्रात बहुश्रुत असलेल्या रांगणेकर काकांची साहित्याशी जमलेली गट्टी पाहिली कि, वाचनशुन्य माझं मलाच लाजीरवाण वाटत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकातील चांगल्या गुणांचं आवडीने गुणगान गाणं "मोठेपणा" याहून दुसर काय असू शकतो. फुलपाखरू प्रत्येक फुलातून मधु प्राशन करत भिरभिरत असत. हे फुलपाखरी व्यक्तिमत्त्व मात्र आपल्याठायी असलेल्या माधुर्याचा मुक्तहस्ताने वर्षाव करत कोमेजलेल्या फुलासही नवा तजेला देण्याच कार्य करत आहे.
       तुमच्या ठायी असलेल्या माधुर्याचा थेंब चाखण्याची संधी दिल्याबद्दल देवबाप्पाचे आभार. काका तुमच्या ह्या आगळ्या वेगळ्या छंदास साष्टांग नमस्कार...!

आपला,

सुरज उतेकर....!!

"मैत्रायण"

प्रिय जनहो
आयुष्यात चांगली माणसे भेटणे हा दैव(देव)योगच म्हणायचा,त्या देव योगाने आयुष्य संपन्न होत आलाय,"अंनंत हस्ते कमलाकराने ,देता किती घेशील दो कराने"हे नक्षत्रंचे देणे सांभाळून तरी कसे ठेवायचे आणि कुठे ,अमृतात पैजा जिंके अश्या माय बोलीचाच आसरा ,,मला भेटलेल्या ह्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण असमान्यात्वाची अदृश्य कवच कुंडले धारण करणाऱ्या ह्या मित्रांची मी रेखाटलेली वेडी वाकडी काहोईना चित्रे
तुमच्या पुढे सादर करण्याची मनोमन इच्छा ,साधन "मैत्रायण ""अपुरी शब्दसंपत्ती आणि अपुऱ्या प्रतिभेचा वारसा घेऊन येणाऱ्या ह्या संकल्पनेला फक्त तुमच्याच प्रेमाचा बुडत्याला काडी सारखा वाटणारा आधार ,तुमचा वाचनीय पाठींबा सदैव असो द्यावा .जिथे पु.ल.सारखी दैवत जन्माला येतात तिथल्या मातीलाही फुलांचा वास येतो हेच खरे,मग ते कोर्हन्तीचा का असेना ,मी अभिमानाने सांगतो कि मी पार्ल्याचा आहे ज्या पार्ल्याचे नाव पु ल.नि अजरामर केले ,माणसांनी माणसाचे देव गुण वर्णावे हा त्यांनी दिलेला वारसा ,त्याची जपणूक करण्याची केलेली एक केविलवाणी का होईना धडपड ,,"मैत्रायण"
शशांक रांगणेकर

Saturday, September 1, 2012

सद्सद बुद्धीचा रखवाल दार नीरद जकात दार


सद्सद बुद्धीचा रखवाल दार नीरद जकात दार
गोपाल कृष्ण आगरकर ह्यांचा उल्लेख महात्मा गांधी आदराने" माझ्या सद्सद विवेक बुद्धीचा रखवाल दार "असा करत. मराठी तरुणाई किती संस्कार क्षम आहे ह्याची उदाहरणे फेस बुक च्या वाल वर वाचायला मिळते तेव्हा समाधानाचा सुस्कारा सोडावासा वाटतो.समाजाच्या ,तरुणाई च्या शुचितेचे डोळ्यात तेल घालून राखण करण्याचे काम,वेळ प्रसंगी शाब्दिक कोरडे ओढण्याचे काम तरुणच करताहेत हि अशादाई बाब आहे.,
नीरद जकातदार हा असाच एक लेखक त्यांनी लिहिलेले दोन लेख माझ्या वाचनात आले ,त्याच्या गुरुवारचा टी वी वर प्रसारित होणारया मालीकांवराचा लेख हा असाच एक अभ्यास पूर्ण लेख.ह्या मालिका काय करू शकतात ह्याची चुणूक आपल्या लेखात मांडताना नीरद म्हणतो "समाजातील बहुतांश सर्व साधारण लोक अंधश्रद्धा ,भूत प्रेत,,अशा गोष्टींवर चटकन विश्वास ठेवतात आणि त्याच्या नदी लागून जीव देण्या घेण्या पर्यंत मजल मारतात.
टी वी ,सिनेमा ,नाटक हि अतिशय प्रभावी माध्यमे आहेत जनमानसावर ह्यांचा फार मोठा पगडा असतो,वृत्तपत्र ,पुस्तके पेक्षाही ह्यातून पसरले जाणारे विचार द्रुत गतीने पसरतात आणि आणि विश्वासली जातात,"ब्रेकिंग न्यूज "नावाखाली पसरवले जाणारे अर्ध सत्य जन सामन्यांच्या मनावर अधो रेखित होते.
बऱ्याच वाहिन्यांवर मालिका दाखवल्या जातात तिथे तर कहरच होतो ,सत्य आणि वास्तवाशी फारकत करूनच बहुतांश ह्या मालिका बनविल्या जातात ,अतिरंजित दृश्ये ,आणि हिंसा,दुराचार ,त्या दुराचाराचे नागडे समर्थन ,आणि पांचट विनोद हा ह्या मालिकांचा गाभा असतो,.अनैतिक संबध ,इर्षा,हिंसा ,ह्यांनीच आपले समाज जीवन भरले आहे का असा संशय निर्माण केला जातो. मराठी मालिकाही त्याच दिशेला चालल्या आहेत,काही मोजके अपवाद सोडता मराठी मालीकानाही हि कीड लागते आहे ,ह्या मालीकातले दुषित नाते संबंधाचे चित्रण अतिशय पोकळ आणि अवास्तव वादी पद्धतीने चित्रित केले जाते आहे,अनैतिक संबंध आणि संशय ह्यातून ओढून ताणून आणलेले नाट्य ,सगळेच खोटे.पण चित्रण इतके प्रभावी की जन सामान्यांना खरेच वाटावे ,.काही काही निर्माते प्रतिथ यश दिग्दर्शक ह्यात निपुण झाले आहेत त्यांचा भाव ह्याने वधारला आहे ,हे चित्रण भयावह आहे ,मराठी मनातल्या सोज्वळ कुलवधू च्या प्रतिमेला तडा देणारे आहे "माझा बाप कोण "अशी संशयाची सुई पैदा करणारे आहे ,स्त्री पुराषांच्या पवित्र नात्यांना नर मादीचे नाते ठरवणारे चित्रण होते आहे.,सवंग लोकप्रियता प्रसिद्धी आणि पैश्या साठी काहीही करू अश्या ह्या मालिका आणि त्यांचे निर्माते आणि दिग्दर्शक वागताहेत.आमचे समाज जीवन इतके प्रदूषित झाले आहेका , नक्कीच नाही , आमच्यातला वारकरी अजूनही जिवंत आहे आणि मला त्याचे दर्शन होते आहे ह्या तरुणाई तून ,नीरद सारखे तरुण अजूनही सजग आहेत ,अप्प्रवृतींशी लढायची हिम्मत दाखवताहेत ,विवेचनातून प्रबोधन हा त्यांचा मार्ग आहे,एक जागल्या जगते राहो म्हणून हाक देणारा ,व्यासंग ,भाषा,आणि विचार ह्याच्या जोरावर अपप्रवृत्तीवर जोरदार हल्ला करणारा तरुण,मन भरून येते .देवाचे उपकार मानावेसे वाटतात सांगावेसे वाटते देवा नीरद सारखे सुपुत्र ह्या मातीला द्यायला ह्या मातीने केलेला पुत्र कामेष्टी यज्ञ नक्कीच सफल झाला आहे.. धोक्याची घनता वाजवणारे नीरद सारखे सुपुत्र हेच ह्या समाजाला तारतील,अगदी देवा सारखे ,आणि म्हणतात ना"देव तरी त्याला कोण मारी ".अप्रवृती चा मुकाबला आपल्या वैचारिक सुदर्शन चक्राने करणाऱ्या नीरद च्या
कृष्ण रुपाला मैत्रायानाचे सदर प्रणाम .
शशांक रांगणेकर , मुंबई
९८२१४५८६०२

Friday, August 31, 2012

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे ,
र.स.प ची कविता वाचतो तेव्हा असाच वाटते ,कि ह्याच्या कवितेत आपण फार गुंतलो जातो,शब्द आणि भावांच्या मायाजालात असा गुंतवतो कि आत गेल्यावर बाहेर यायचे रस्तेच बंद ,ह्याच्या कवितेच्या बंदिशालेतले तुम्ही एक बंदीच,आणि ह्याच्या शब्दांची उबदार शेलारी ने तो बंदिवास नुसताच सुसह्य नव्हे तर हवा हवासा वाटतो,
ह्याच्या ब्लोग वर मी सफरीला गेलो तेव्हा कळले की हि आकाश गंगेची सफर आहे अगणित ताऱ्यांचे तेज सामावून हि आकाश गंगा लखलखते आहे ,हि अनंत आहे अगणित आहे ,गद्य पद्य ,चित्र ,साहित्याच्या आणि कवितेच्या सर्वांगानं स्पर्शून सुगंधित झाली आहे,नादोमय तेजोमय साहित्य च्या अगणित बुट्ट्या ची पैठणी नेसून आलेली कुल वधू च , जणू.
रसप ला परमेश्वराने कुठल्या मुशीतून घडवले आहे ते कदाचित तो हि विसरला असेल कारण तो असे चित्र तो कधीतरीच काढतो ,खरे तर काढू शकतो नाहीतर व्यंग चित्र काढणे हा नेहमीचा उद्योग.एखाद्या बाग्वानाने सर्वच प्रकारची झाडे लावावी आणि त्या सर्वच झाडांना रसरशीत फळे यावीत तशी रसप ची साहित्यकृती आहे ,काहीही उणे नाही.
हा नुसताच शब्दांचा डोंबारी नाही तर शब्द आणि भावाच्या कुमार संभावातून साहित्याची निर्मिती करणारा निर्माता आहे.
ह्याची प्रत्येक साहित्यकृती हा एक अमर्त्य चिंतनाचा एक साक्षात्कारी अनुभव,पण तो आनंदानुभव घ्यायला आपलीच झोळी फाटकी असता कामा नये नाही तर देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.
गोड कसे लागते,चाफ्याचा सुंगंध कसा असतो ह्याची मोज मापे अंकात मांडताच येत नाही ,हा अमृतानुभव आहे कुठल्याही मोजमापात बंदिस्त न करता येण्या जोगा ,हा ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो ,रसप च्या साहित्याकृतीना मैत्रयाणाचे शुभाशीर्वाद
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Thursday, August 30, 2012

नीरद ची जकात

नीरद ची जकात
महाराष्ट्र वारकऱ्यांचा प्रदेश आहे ,"भक्ती भावाने विठुरायाचे नाव घेत घेत पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा हा प्रदेश आहे,तसाच "भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू असे बजावणाऱ्या तुकोबांचा प्रदेश आहे ,इथल्या मातीला भोळा भाव माहिती आहे पण भोळसट भक्ती माहित नाही ,भक्ती आणि श्रद्धेला ज्ञानाची दिव्य दृष्टी ह्या मातीनेच दिली आहे ,इथला भूमिपुत्र सर्वार्थाने वारकरी आहे आनंदाने गात नाचत पंढरीला जाणारा मेणाहूनही मउ असणारा आणि वेळप्रसंगी धार्मिक आणि सामाजिक अपप्रवृत्तींवर बेशालक वार करणारा वारकरी,,
संताची नामावली तर विष्णू सहस्त्र नामा पेक्षाही मोठी ,डोळस भक्ती ची मुळे इथल्या मातीत घट्ट रुजली आहेत ,अंध श्रद्धा ,इथल्या मातीत रुजत नाही ,म्हणूनच ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम ,समर्थ रामदास ,संत नामदेव ,संत चोख मेळा,संत एकनाथ ,संत ज्ञान देव , ,संत जना बाई,मुक्ता बाई , आणि कित्येक संताने दिलेली ज्ञान दृष्टी अजूनही सुस्पष्ट आणि लखलखीत आहे ,,मराठी मनावर अनेक समाज सुधारकाने केलेलेले संस्कार शाबूत आहे , महात्मा फुले ,लोकहितवादी गोपाळराव देशमुख ,तेल्याताम्बोल्यांचे पुढारी लोकमान्य टिळक ,बाबासाहेब आंबेडकर ,न्यायमूर्ती रानडे,सार्वजनिक काका,शाहू महाराज,ह्यांची शिकवण अजूनही मराठी माणूस विसरला नाही ,"बहुजन हिताय बहु जन सुखाय "राज्यावर आलेली शिवमुद्रा अजूनही मराठी मनावरून पुसट झालेली नाही.
काही अभद्र घटना महाराष्ट्रात घडतात पण त्याचा समाचार घेणारे अर्वाचीन संत हि महाराष्ट्रात आहेत ,असाच एक वारकरी "नीरद जकातदारनीरद जकातदार ".
नागपूर च्या संत्र सारखे रसाळ रूप आणि वडा भाता सारखी चटपटीत लेखणी ,हा छोटा मुलगा इतके तर्क शुद्ध लिहितो कि भाषेला तोड नाही ,त्याच्या लेखातला एकही शब्द बदलण्याची हिम्मतही कोणाला होणार नाही.
तर्क शुद्ध विचार ,,विचारची सखोलता ,आणि अर्थशास्त्र ,समाज शास्त्र ,आणि वैचारिक सुस्पष्टते वर आधारित लेखन.आणि तेही अतिशय सभ्य आणि समंजस भाषेत,कसलाही आक्रस्ताळी पणा नसलेले विचार पूर्वक ठाम मते मांडणारेच नव्हे तर पटवणारे लेखन.वय आणि बुद्धी ह्याचा संबंध असोतोच असे नाही हे ठोक बजावून सांगणारे लेखन .
नीरद एक अर्वाचीन संताची भूमिका बजावतो आहे ,ज्याची प्रवृत्ती निरपेक्ष वृत्तीने समाज प्रबोधन करण्याची आहे तो संत.
ह्या लहान वयातही हे ईश्वरीय लेणे लाभते कसे ,उत्तर एकाच" शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी,
फक्त वयाने मोठा असल्याने मिळालेल्या निसर्ग दत्ता अधिकाराने नीरद ला अनेक आशीर्वाद खरे तर शुभेछाच ,आणि त्याला घडवणाऱ्या त्याच्या मत पित्यांना आणि गुरुजनांना मैत्रायानाचे सदर प्रणाम.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Tuesday, August 28, 2012

दगडी फुल (प्रशांत जामदार)

दगडी फुल (प्रशांत जामदार)
मसाल्याच्या पदार्थात दगडी फुल नावाचा एक पदार्थ असतो,तुम्हाला माहित आहे कि नाही मला माहित नाही पण मला मात्र माहिती आहे ,मसाल्याचे पदार्थ करताना आई आवर्जून हे वापरायची ,दगडी फुल नावच किती वेगळे तरीही काव्यात्मक आहे दगड आणि फुले ,दगडाचा भक्कम पण आणि फुलांची नाजूकता अनुभवाची असेल तर "प्रशांत जामदार "ह्या कवीची कविता वाचावी अगदी "फुल और पत्थर "शब्द शब्दांना वेदनेचा पाझर फोडणारी प्रशांतची कविता ,मानवी अपप्रवृत्तीवर कोरडे ओढताना दिसते , "दारावर लाख सत्कार झाले पण आते ये कोणी म्हणालेच नाही "हे शब्द म्हणजे "सहन होत नाही आणि सांगता येत नाही "अश्या वेदनेची एक अव्यक्त सल,वेदनेला शब्दात पकडता येत नाही पण भावात प्रगट करता येते ह्याचे सादरीकरण करणारी हि कविता.
वर वर शांत दिसणाऱ्या ह्या प्रशांतच्या कवीमनात वेदनेचे किती लाव्हा उफाळतात आहे हे समजायचे असेल तर माणूस प्रशांत सारखाच दिलदार पाहिजे,
काही कवी शब्दांचे गुलाम असतात शब्दांची चाकरी करता करता भावांशी नाती सोडतात पण प्रशांत ची कविता मात्र अगदी प्रथम पुरशी एक वचनी त्याच्या पूर्ण कह्यात असणारी शब्दांना सांभाळत भावना फुलवणारी "घे एकवार नाव माझे "हि अशीच एक साध्या सोप्या शब्दातून कवीच्या भाव विश्वाचे आरस्पानी दर्शन करवणारी कविता ,
प्रशांत ची कविता हि माणुसकीचा चेहरा मोहरा घेऊन येते आणि म्हणूनच ती म्हणते "राहू दे असेच डोळे आसवांना घर असुदे .......
प्रशांतची कविता हि सर्वगामी आहे सुखादुक्खा बरोबर उंच उंच झोका घेणारी ,आणि तरीही वास्तवाची साथ न सोडणारी.दुक्खला कुरवाळ णारी आणि सुखाला फुलवणारी आशय घन कविता."प्रशांत समयी हा प्रशांत चा काव्य संग्रह असावा त्याची लिंक त्याने दिली तर वाचायला सुलभ होईल.
प्रशांत हा अभिनेता दिग्दर्शक अश्या सर्वच क्षेत्रात लीलया वावरतो आणि आपला ठसा उमटवतो आहे,
हे व्यक्तिमत्वच बहु आयामी आणि प्रगल्भ आहे ,आणि दगडी फुला सारखे .दगडासारखे अचल आणि फुलासारखे कोमल.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२