Friday, February 3, 2012

आशीर्वाद 
उपासनेचे फळ कधी उशीराही  मिळते ,पण न मिळता राहत नाही, म्हणतात "भगवान के घर मे देर है अंधेर नही",आशीर्वाद मराठे ,एक मराठी  रंगकर्मी ,मध्यम वर्गीय घरातला एक होतकरू मुलगा हुशार कष्टाळू पण वेड्यात दौडले सात मराठी वीर ,त्यातला एक वेडा वीर वेड एकच माय मराठीची सेवा. ,
एक हुशार वकील पण ह्या वकिलांनी वकिली करायची ठरवली आहे मराठी रंगभूमीची ,त्याला साथ देतेय त्याची अर्धागिनी ,कर विषयक वकिली करता करता हा वकील नाटकही करतो,सिरीयल मध्ये काम करतो आणि स्वतःची पदरमोड करून संस्था हि चालवतो ,कोणीही god fathar नसलेला हा मर्द मराठा स्वतःच लढतोय आपली लढाई ,कोणाचाही पाठींबा नसलालेला आणि कामासाठी कुठलीही तडजोड करायला तयार नसलेला हा रंगकर्मी अजूनही विंगेतच उभा आहे,.
मराठी माणूस कुठे कमी पडतो ह्याचा विचार आपण केला पाहिजे "जाती साठी माती खावी म्हणतात  आम्हा सर्वांची जात एकच मराठी ,आपल्या मराठी लेबल मुळे जर एखादा मराठी माणूस दुर्लक्षित होत असेल ,तर ते थांबवले गेले पाहिजे ,कला गुणाने    संपन्न  असलेल्या  माणसाला फक्त नशिबाच्या लहरी झोक्यावर सोडणे म्हणजे मराठी रंगभूमीला मिळालेला शाप ठरेल.
जे मराठी रंगभूमीच्या सहाय्याने मोठे झाले आहेत दूरचित्रवाणीच्या योगे प्रसिद्धीच्या झोतात येताहेत त्याचे एक देवदत्त कर्तव्य आहे आशीर्वाद  सारख्या अष्टपैलू हिऱ्यांना प्रसिद्धीच्या कोंदणात  बसावा आणि म्हणा "एक मेक
सह्या करू अवघे धरू सुपंथ "
शशांक रांगणेकर

Wednesday, February 1, 2012

समाधान

चिरंजीव अजय,
तुझ्या वाल वरचे भावलेले एक वाक्य doing very good.. beyond my expectations !!! Tell your's.. how r u doing? :)समाधान हि एक प्रकारची योग साधनाच आहे दुध तापवल्या नंतर आणि निवल्यावर जशी साय साचते तसे परिश्रमाचे चटके खाऊन आता समाधानाची साय पसरली आहे,i m a simple & straight forward person with a little inclination towards spirituality.
 हे तुझ्या वाल वरचे वाक्य शत प्रतिशत सत्य आहे ज्याला समाधान गवसले त्याला आत्मा गवसला ,आत्मज्ञान प्राप्त झाले,तुझ्यासारख्या समाधानी  डॉक्टर ने पाणी दिले तरी त्याला औषधाचे गुण प्राप्त होतील.समाधानाचे उद्गार हि देवाला त्यांनी सुखी ठेवलाय असे सांगणारी एक पावतीच."औषधं जान्हवी तोयं वैद्यो नारायणं हरी "
शशांक रांगणेकर

Tuesday, January 31, 2012

satrangi

प्रिय जनहो
आपल्या अजयचा सतरंगी रे हा चित्रपट काहीच दिवसात प्रदर्शित होईल ,अजय नाईक एक साधासुधा मराठी मुलगा ,आपली सुखाची नोकरी सोडून चित्रपट निर्मितीत उतरला आहे ,एक स्वच्छ साधे मराठी जग आणि तरुणाई चे सप्त रंग त्यांनी ह्यात रंगवले आहेत,माझ्या फेस बुक च्या सर्व मित्रांना एक विनंती आहे कि सर्व मराठी जनानी ह्या आपल्या अजयच्या सतरंगी ला मनापासून पाठींबा द्या , त्यला आणि त्याच्या टीम ला तुमच्या शुभेच्छ...ा ची नितांत गरज आहे ,फेस बुक वरच्या सर्व तरुणाईला बुजुर्गांना विचारवंताना साहित्यिकांना कळकळीची विनंती की आज मनात पक्का विचार करा की आम्ही हा बोलपट चित्रपट गृहात जाऊन बघू ,माझे फेस बुक चे जेष्ट सदस्य श्री दत्ताजी सराफ ह्यांना कळकळची विनंती कि त्यांनी अजयला व सतरंगी च्या टीम ला हार्दिक आशीर्वाद द्यावेत ,एक मराठी मुलगा चांगले काम करतोय त्याचा पहिलाच चित्रपट आहे तोही शत प्रती शत स्वच्छ मराठी चित्रपट ,दत्ताजी तुमचे आशीर्वाद अजयकडे पोहचू द्यात,"फेस बुक च्या माझ्या मित्रानो
आजच अजयच्या वाल वर जाऊन त्याला दिलासा द्या कि अजय सतरंगी आमचा चित्रपट आहे म्हणून किमान एकदा तरी आम्ही तो चित्रपट गृहात जाऊन बघ.कारण आम्ही सर्व मराठी आहोत.
 

शशांक रांगणेकर 
९८२१४५८६०२

Monday, January 30, 2012

dole

डोळे म्हणजे मनाच्या दोन खिडक्या ,शब्दाने व्यक्त न करता येणारे भाव व्यक्त करण्या साठी माणसाला मिळालेले एक अस्पर्श वरदान ,कधी कधी नियती काही जणांच्या बाबतीत उजवे दान टाकते ,अतिशय बोलके आणि प्रभावी डोळे बहाल करते ,असेच बोलके आणि प्रभावी डोळे फेस बुक वर सर्फ  करताना दिसले ,मालकाचे नाव आहे "Aastad  Sunita Pramod काळे"
 .प्रभावी अस्मान्ताचा वेध घेणारी" प्रथम पुरुषी एकवचनी "नजर "सिकंदर च्या  बाबतीत म्हणतात" तो आला त्याने पहिले आणि त्याने जिंकले"सिकंदर आपली प्रभावी नजर अस्तद  ला देऊन गेला असावा अये वाटावे असे डोळे मिळणे हे खरे तर नक्षत्रांचे देणे "
शशांक रांगणेकर
 .

Tuesday, January 24, 2012

जग बदलतंय माणूस बदलतोय

               दिनेश तळेकर
जग बदलतंय माणूस बदलतोय नेहमीची ओरड ,म्हणून मी सतत शोधात असतो बदलणारा माणूस ,पण मला मात्र तो भेटत नाही आहे ,मला भेटलेला माणूस अजूनही त्याची माणुसकीची सर्व कवच कुंडलं सांभाळून आहे,प्रत्यक्षात न भेटताही आपल्या प्रोफाईल  मधून भेटलेला आणि एक माणुसकीचा चेहरा मोहरा बाळगणारा एक नवयुवक "दिनेश तळेकर"प्रिय जनहो "तुम्हीही बघा त्याचे प्रोफाईल म्हणजे तुम्हालाही कळेल कि सहुदय माणूस कसा असतो,दिनेश जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती "जग हि तेच सत प्रवृर्तीचे संतही तसेच,मग काय बदलले आहे काहीच नाही,फक्त बदलला आहे तो त्यांचा पोशाख संत प्यांट शर्ट मध्ये भेटताहेत बदल ला आहे ते एवढाच.
शशांक रांगणेकर

Friday, January 20, 2012

Thursday, January 12, 2012

तुझा विसर न व्हावा "

"तुझा विसर न व्हावा "

स्मृतिचित्रे ,मराठी साहित्यातील एक अद्भुत कलाकृती ,सकस आणि कसदार साहित्याला स्वानुभवाच्या वेंनाच जन्माला घालू शकतात ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे "संपूर्ण स्मृति चित्रे ,आचार्य अत्र्यांनी

लक्ष्मि बाई टिळकांचा साहित्य लक्ष्मी  म्हणून यथोचित गौरव केला आहे ,मागील अर्ध शतकाचा सामाजिक इतिहास ह्या ग्रंथात उलगडला गेला आहे ,प्रतिकूल परिस्तिथी ने कुठल्याही शाळेत न गेलेल्या

ह्या साहित्य लक्ष्मिने आपल्या संवेदना शील मनाचे बोल इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत मांडले आहेत त्याला मराठी साहित्यात तोड नाही,"सत्य हे कल्पने पेक्षा अधिक बोधक आणि रम्य असते

,म्हणूनच विस्मृतीच्या पडद्या आड ते कधीही पुसले जात नाही ,मराठी माणूस ,आणि साहित्य ह्या साहित्य लक्ष्मि ला कधीही विसरू शकणार नाही ,मराठी साहित्यातला हा एक मैलाचा दगड,ह्या साहित्य लक्ष्मिचे

पुण्या स्मरण करताना म्हणावेसे वाटते कि "तुझा विसर न व्हावा "

शशांक रांगणेकर