गुण गाईन आवडी
तरुण पिढी बिघडते आहे ,लहान मोठ्यांचा काही धरबंधच नाही ,जेष्ठांची ओरड ,कारण नसताना ,आजची पिढीही तेवढीच विनम्र आहे ,"सतेज पडवळ"नावाचा एक fb माझा मित्र आहे
वय वर्षे २१ अथवा २२ .बोलताना मला त्यांनी मित्रा म्हणून संबोधले ह्यांनी मी जेवढा सुखावलो त्यापेक्षा कितीतरी पटीने तो हळहळला,आपली एक अक्षम्य चूक झाली आहे असे त्याला
वाटते ,आणि हि चूक न चुकता त्यांनी करावी असे मला वाटते ,असो थोडक्यात सांगायचे कि आजची पिढीही आमच्या एवढीच सुशिक्षित विनम्र आणि सोज्वळ आहे ,आपल्या पाल्यावर
उत्तम संस्कार केल्याबद्दल त्याचे पालक आणि तो दोघेही अभिनंदनास पात्र आहेत.
शशांक रांगणेकर
Thursday, December 22, 2011
vrukshavalli amha
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ,तुकोबांचा एक अभंग ,निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते ह्या अभंगात सांगितले आहे ,ज्याला हे नाते कळले त्याला परमार्थ कळला ,निसर्गच माणसाचा गुरु ,"बंदगी तो
अपनी फितरत है खुदा हो न हो असे म्हणत अव्यक्त निर्गुण परमेश्वराचे व्यक्त रूप जे निसर्गात दिसते त्याची मानसपूजा करणारा माझा एक मित्र "श्रीश देशपांडे"त्याने नैसर्गिक सौंदर्याचे टिपलेले एक अप्रतिम छाया चित्र'निर्गुण परमेश्वराची सगुण रूपे दाखवणारा श्रीश हा खरोखरच सात दिवसाच्या विश्रांती नंतर परमेश्वरानी निर्मिलेली अप्रतीम कला कृति.
अपनी फितरत है खुदा हो न हो असे म्हणत अव्यक्त निर्गुण परमेश्वराचे व्यक्त रूप जे निसर्गात दिसते त्याची मानसपूजा करणारा माझा एक मित्र "श्रीश देशपांडे"त्याने नैसर्गिक सौंदर्याचे टिपलेले एक अप्रतिम छाया चित्र'निर्गुण परमेश्वराची सगुण रूपे दाखवणारा श्रीश हा खरोखरच सात दिवसाच्या विश्रांती नंतर परमेश्वरानी निर्मिलेली अप्रतीम कला कृति.
ajay naik
प्रिय जनहो,
,मराठीत एक म्हण आहे "जाती साठी माती खावी ",आणि आम्हा सर्व मराठी माणसांची एकच जात आहे ती म्हणजे मराठी ,आपल्या एका मराठी युवकाने एका
सिनेमाची निर्मिती केली आहे नाव आहे सतरंगी ,थोड्याच दिवसात तो प्रदर्शित होईल,आपली सुखाची नोकरी सोडून त्याने हे धाडस केले आहे,
मराठी कलाक्षेत्राची सेवाकारताना त्याला तुमच्या सहकाऱ्याची जरुरी आहे ,सतरंगी च्या यशाचे तुम्ही शिल्पकार ठरणार आहात ,सतरांगीला मनापासून
पाठींबा द्या ,चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहा ,प्रश्नतुमचा हा चित्रपट आम्ही का पाहावा ? उत्तरहि तुमचेच "हा सिनेमा एका मराठी मुलाने काढला आहे "अजय नाईक" ने .
शशांक रांगणेकर
,मराठीत एक म्हण आहे "जाती साठी माती खावी ",आणि आम्हा सर्व मराठी माणसांची एकच जात आहे ती म्हणजे मराठी ,आपल्या एका मराठी युवकाने एका
सिनेमाची निर्मिती केली आहे नाव आहे सतरंगी ,थोड्याच दिवसात तो प्रदर्शित होईल,आपली सुखाची नोकरी सोडून त्याने हे धाडस केले आहे,
मराठी कलाक्षेत्राची सेवाकारताना त्याला तुमच्या सहकाऱ्याची जरुरी आहे ,सतरंगी च्या यशाचे तुम्ही शिल्पकार ठरणार आहात ,सतरांगीला मनापासून
पाठींबा द्या ,चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहा ,प्रश्नतुमचा हा चित्रपट आम्ही का पाहावा ? उत्तरहि तुमचेच "हा सिनेमा एका मराठी मुलाने काढला आहे "अजय नाईक" ने .
शशांक रांगणेकर
Thursday, October 13, 2011
snehal
गुण गाईन आवडी
स्नेहल पोतदार ,नावाप्रमाणेच एक प्रेमळ व्यक्तिमत्व ,नावात काय आहे म्हणतात पण स्नेहलच्या नावातच त्याचे व्यक्तिमत्व सामावलेले आहे, त्याची शब्दाशब्दात
एक स्नेहाचा धागा दडलेला आढळतो ,एक उभारता उद्योजक,स्व कर्तृत्वावर याचाची वाट चोखाळणारा हा तरुण उद्योजक,पण व्यावासिकातेने त्य्च्यातला माणूस विझलेला
दिसत नाही तर त्याच्या माणुसकीने व्यावासिक तेला गहीरे रंग दिले आहेत ,तो जेवढा यशस्वी उद्योजक आहे तेव्हढाच मोठा माणूस,आपल्या आईचे ऋण कधीही न विसरणारा
एक सुपुत्र ,माणुसकीचे नाते मनात आणि शब्दात जपणारा स्नेहल .
शशांक रांगणेकर
स्नेहल पोतदार ,नावाप्रमाणेच एक प्रेमळ व्यक्तिमत्व ,नावात काय आहे म्हणतात पण स्नेहलच्या नावातच त्याचे व्यक्तिमत्व सामावलेले आहे, त्याची शब्दाशब्दात
एक स्नेहाचा धागा दडलेला आढळतो ,एक उभारता उद्योजक,स्व कर्तृत्वावर याचाची वाट चोखाळणारा हा तरुण उद्योजक,पण व्यावासिकातेने त्य्च्यातला माणूस विझलेला
दिसत नाही तर त्याच्या माणुसकीने व्यावासिक तेला गहीरे रंग दिले आहेत ,तो जेवढा यशस्वी उद्योजक आहे तेव्हढाच मोठा माणूस,आपल्या आईचे ऋण कधीही न विसरणारा
एक सुपुत्र ,माणुसकीचे नाते मनात आणि शब्दात जपणारा स्नेहल .
शशांक रांगणेकर
Thursday, September 15, 2011
tanmay
चिरंजीव तन्मय'
रिकामटेकड्या लोकांबद्दल आलेला राग साहजिकच आहे,पण एक प्रेमाचा सल्ला देतो आहे,तू स्वताहून सतीचे वाण घेतले आहेस,तुझा मार्ग तू निवडला आहेस,
आणि ह्या मार्गावर तू इतका पुढे गेला आहेस कि आता माघार नाही,ह्या राग लोभाच्या फेऱ्यातून तुझ्या युयुत्सु आणि समाज प्रेमी भावनेने कधीचाच मुक्त
झाला आहेस ,तुझे कार्य फार मोलाचे आहे ज्यांना काहीही पडलेले नाही अश्या पडीक लोकांबद्दल विचार करण्याचे सोड बघूही नकोस,तुझी वैचारिक क्षमता आणि निरिच्छ वृत्ती ही तुझी देवदत्त कवच कुंडले आहेत
बाकी छोट्यामोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस,
शशांक रांगणेकर
शशांक रांगणेकर
रिकामटेकड्या लोकांबद्दल आलेला राग साहजिकच आहे,पण एक प्रेमाचा सल्ला देतो आहे,तू स्वताहून सतीचे वाण घेतले आहेस,तुझा मार्ग तू निवडला आहेस,
आणि ह्या मार्गावर तू इतका पुढे गेला आहेस कि आता माघार नाही,ह्या राग लोभाच्या फेऱ्यातून तुझ्या युयुत्सु आणि समाज प्रेमी भावनेने कधीचाच मुक्त
झाला आहेस ,तुझे कार्य फार मोलाचे आहे ज्यांना काहीही पडलेले नाही अश्या पडीक लोकांबद्दल विचार करण्याचे सोड बघूही नकोस,तुझी वैचारिक क्षमता आणि निरिच्छ वृत्ती ही तुझी देवदत्त कवच कुंडले आहेत
बाकी छोट्यामोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस,
शशांक रांगणेकर
शशांक रांगणेकर
Tuesday, September 13, 2011
parivartan
चिरंजीव तन्मय,
परिवर्तन सक्रीय राजकारणात जरूर उतरावे,नाहीतर काठावर बसून पोहणे शिकवण्या सारखे होईल
,परिवर्तन किती आणि कसे परिवर्तन करेल हे कालच ठरवेल पण "केल्याने होत आहेरे आधी केलेच पाहिजे"
हे नक्कीच ,ज्या पद्धतीने परिवर्तन काम करत आहे ह्यातून एक गोष्ट कळते की हातात परिवर्तनाची मशाल
घेऊन हा काफिला निघाला आहे ,नक्कीच वाटते की मंझील अब दूर नही,आयुष्याची संध्याकाळी तुमच्या पिढीसाठी
तुमचे निष्काम भावनेने चालेले कार्य पाहून फक्त वयाने आलेल्या मोठे पणाला स्मरून मनापासून आशिर्वचने येतात"
"शुभास्ते पंथानः सन्तु"
शशांक रांगणेकर
परिवर्तन सक्रीय राजकारणात जरूर उतरावे,नाहीतर काठावर बसून पोहणे शिकवण्या सारखे होईल
,परिवर्तन किती आणि कसे परिवर्तन करेल हे कालच ठरवेल पण "केल्याने होत आहेरे आधी केलेच पाहिजे"
हे नक्कीच ,ज्या पद्धतीने परिवर्तन काम करत आहे ह्यातून एक गोष्ट कळते की हातात परिवर्तनाची मशाल
घेऊन हा काफिला निघाला आहे ,नक्कीच वाटते की मंझील अब दूर नही,आयुष्याची संध्याकाळी तुमच्या पिढीसाठी
तुमचे निष्काम भावनेने चालेले कार्य पाहून फक्त वयाने आलेल्या मोठे पणाला स्मरून मनापासून आशिर्वचने येतात"
"शुभास्ते पंथानः सन्तु"
शशांक रांगणेकर
Sunday, August 21, 2011
pratiyogi sahkarita
चिरंजीव तन्मय,
तु प्रतियोगी सहकारिता हा जो मुद्दा मांडला आहेस तो नक्कीच व्यवहार्य वाटतो "सर्व नाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः ,असेही म्हणतात ,
समजूतदार पणातून संघर्ष हा नक्कीच फलादाई ठरेल ,ह्या वयातही प्रतीत होणारी हि प्रतियोगी सहकारिता हा तोडगा तुझ्या बुद्धी प्रमाण्याला
अनुकूल असाच आहे,श्रीकृष्ण नीतीचे हे मनोहारी दर्शन हर आजच्या तरुणाई आदर्श वत ठरावे,तुझ्या सुबुद्ध मनोवृत्तीला मनापासून आशीर्वाद
आशीर्वाद हा शब्द्द फक्त वयाच्या आणि फक्त वयाच्या अंतराला आठवून वापरलेला आहे अथवा नमस्कार हाच शब्द त्यातल्या भावनासकट उचित असेल.
शशांक रांगणेकर
तु प्रतियोगी सहकारिता हा जो मुद्दा मांडला आहेस तो नक्कीच व्यवहार्य वाटतो "सर्व नाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः ,असेही म्हणतात ,
समजूतदार पणातून संघर्ष हा नक्कीच फलादाई ठरेल ,ह्या वयातही प्रतीत होणारी हि प्रतियोगी सहकारिता हा तोडगा तुझ्या बुद्धी प्रमाण्याला
अनुकूल असाच आहे,श्रीकृष्ण नीतीचे हे मनोहारी दर्शन हर आजच्या तरुणाई आदर्श वत ठरावे,तुझ्या सुबुद्ध मनोवृत्तीला मनापासून आशीर्वाद
आशीर्वाद हा शब्द्द फक्त वयाच्या आणि फक्त वयाच्या अंतराला आठवून वापरलेला आहे अथवा नमस्कार हाच शब्द त्यातल्या भावनासकट उचित असेल.
शशांक रांगणेकर
Subscribe to:
Posts (Atom)